भारताने वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या अंडर-१९ वर्ल्डकप (ICC Under 19 World Cup 2022) स्पर्धेत गतविजेत्या बांगलादेशला पराभूत केलंय. तसेच उपांत्य फेरीत (सेमी फायनल) आपली जागा निश्चित केली. विशेष म्हणजे भारताने या विजयासह बांगलादेशसोबतचा बदलाही पूर्ण केला. याच बांगलादेशने २०२० मध्ये भारताला अंतिम फेरीत नमवून जेतेपदावर नाव कोरलं होतं. आता उपांत्य फेरीत भारतासमोर ऑस्ट्रेलियाचं आव्हान असणार आहे.

या सामन्यात भारताचा कर्णधार यश धुलने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या गोलंदाजांनी कर्णधाराच्या निर्णयाचा मान राखत बांगलादेशला ३७.१ षटकात १११ धावांवर ऑलआऊट केले. त्यानंतर भारतीय फलंदाजांनी ३१ व्या षटकातच ५ विकेटने बांगलादेशला पराभवाची धूळ चारली आणि सामना खिशात टाकला.

Despite the efforts of PR Sreejesh the Indian hockey team lost
श्रीजेशच्या प्रयत्नांनंतरही भारतीय हॉकी संघाचा पराभव
Mohammad Amir and Imad Wasim Returns to Pakistan National Team
फिक्सिंग, बंदी आणि निवृत्तीनंतर मोहम्मद आमिर पुन्हा पाकिस्तानच्या टी-२० संघात
riyan parag
वेदनाशामक औषधे घेऊन रियान परागची निर्णायक खेळी!
Virat Kohli
सातत्यपूर्ण कामगिरीचा बंगळूरु, कोलकाताचा प्रयत्न; ‘आयपीएल’मध्ये आज आमनेसामने

बांगलादेशचा डाव

महफिझुल इस्लाम आणि इफ्तेखार हुसेन यांनी बांगलादेशच्या डावाची सुरुवात केली. पण सांघिक तिसऱ्या धावावर बांगलादेशला पहिला धक्का बसला. रवी कुमारने महफिझुलचा (२) त्रिफळा उडवला. त्यानंतर रवीनेच दुसरा सलामीवीर इफ्तेखार हुसेन (१) आणि त्यानंतर आलेल्या प्रांतिक नवरोजला (७) बाद करत बांगलादेशची अवस्था खिळखिळी केली. संघाच्या ५६ धावा फलकावर असताना बांगलादेशने ७ फलंदाज गमावले. त्यानंतर एसएम महरोबने ३० धावांची खेळी केली, पण दुसऱ्या बाजूने त्याला साथ लाभली नाही. अखेर राजवर्धन हंगरगेकरने तंजीम हसन साकिबला झेलबाद करत बांगलादेशचा डाव १११ धावांवर संपुष्टात आणला. भारताकडून रवी कुमारने १४ धावांत ३, विकी ओसवालने २५ धावांत २ बळी घेतले.

भारताचा डाव

बांगलादेशच्या ११२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला सुरुवातीला एक झटक बसला. हरनूर सिंह खातं न उघडताच बाद झाला. दुसरीकडे अंगकृश रघुवंशीने ४४ धावांची दमदार खेळी केली. रशीदने २६ धावा केल्या. अंगकृश आणि रशीदने ७० धावांची भागेदारी केली. मात्र, बांगलादेशचा रिपन मंडल या गोलंदाजाने ४ गडी बाद करत सामन्यातील चूरस वाढवली. त्यामुळे भारताची स्थिती ९७ वर ५ बाद अशी झाली. यानंतर भारताचा कर्णधार यश डुल (२०) आणि कौशल तांबे (११) यांनी ३१ व्या षटकातच विजय मिळवून दिला. कौशलने षटकार लगावत हा सामना जिंकला.

दोन्ही संघांची Playing 11

भारत : अंगक्रिश रघुवंशी, हरनूर सिंग, शेख रशीद, यश धुल (कर्णधार), राज बावा, कौशल तांबे, सिद्धार्थ यादव, दिनेश बाना (यष्टीरक्षक), विकी ओसवाल, राजवर्धन हंगरगेकर, रवी कुमार.

हेही वाचा – VIDEO : “मला सचिनची दया येते, कारण…”, वाचा असं का म्हणाला शोएब अख्तर?

बांगलादेश : महफिझुल इस्लाम, इफ्तेखार हुसेन, प्रांतिक नवरोज नबिल, आइच मोल्ला, मोहम्मद फहीम (यष्टीरक्षक), आरिफुल इस्लाम, एसएम महरोब, रकीबुल हसन (कर्णधार), आशिकुर जमान, तंजीम हसन साकिब, रिपन मोंडोल.