Gautam Gambhir on Rohit Sharma Virat Kohli Test Future: भारतीय संघाने तब्बल १ दशकानंतर बॉर्डर गावस्कर ट्रॉफी गमावली आहे. ऑस्ट्रेलियाने सिडनी कसोटीत भारताचा ६ विकेट्सने पराभव करत मालिका ३-१ च्या फरकाने जिंकली. चौथ्या कसोटीत विजयाने सुरुवात करणाऱ्या टीम इंडियाला यानंतर एकही सामना जिंकता आला नाही. मालिकेदरम्यान कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या फॉर्मची मोठी चर्चा होती. रोहितने शेवटच्या कसोटीत स्वतःला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवले होते. सिडनी कसोटीनंतर प्रशिक्षक गौतम गंभीर यांना या दोन्ही दिग्गजांच्या भवितव्याबद्दल वक्तव्य केलं आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये एकाच पद्धतीने सलग बाद झाल्यामुळे विराट कोहलीवर जोरदार टीका होत आहे. खराब फॉर्ममुळे स्वतः कर्णधार रोहित शर्माने सिडनी कसोटी सामना न खेळण्याचा निर्णय घेतला. मात्र, हे अवघड पाऊल उचलूनही संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही. अवघ्या तीन दिवसांत खराब फलंदाजीमुळे भारताला ६ विकेट्सने पराभव पत्करावा लागला. भारताने सिडनी सामना जिंकला असता तर त्यांना मालिका २-२ अशी बरोबरी साधता आली असती.

Saif Ali Khan
“दरोड्याचा प्रयत्न फसला…”, सैफ अली खानचे हल्लेखोराबाबत मोठे वक्तव्य; म्हणाला, “त्या बिचाऱ्या…”
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Veteran singer Asha Bhosle statement on Narendra Modi and Yogi Adityanath
म्हणून मला मोदी अन् योगी आवडतात….ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे वक्तव्य
IND vs ENG Gautam Gambhir may be unhappy with Rohit Sharma duos intense chat triggers speculations after video viral
IND vs ENG : गौतम गंभीर रोहित शर्मावर नाराज? सामन्यानंतरचा VIDEO व्हायल झाल्यानंतर चर्चेला उधाण
chaggan bhujbal
..तर धनंजय मुंडेचा राजीनामा घ्या- छगन भुजबळ
Maharashtra Kesari 2025 result Shivraj Rakshe prithviraj mohol Controversy
Maharashtra Kesari : एवढं ‘मोहोळ’ का उठलंय? राष्ट्रवादीच्या नेत्याचा कुस्तीत राजकारण शिरल्याचा आरोप; म्हणाले, “खरा जिंकला तो…”
Sanjay Raut Ajit Pawar (1)
“अजित पवारांना आता मुख्यमंत्री व्हायचं नाही, कारण…”, संजय राऊतांची स्तुतीसुमने; नेमकं काय म्हणाले?
Shivsena MLA Arjun Khotkar
Arjun Khotkar : “राजकीय भूकंप काय असतो हे आम्ही दाखवून देऊ”, अर्जुन खोतकरांचं मोठं विधान; कोणाला दिला इशारा?

हेही वाचा – WTC Final: भारत WTC फायनलसाठी ‘नापास’; वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप इतिहासात पहिल्यांदाच घडलं असं काही; ऑस्ट्रेलिया वि. दक्षिण आफ्रिकेत रंगणार अंतिम सामना

सिडनी कसोटी सामना संपल्यानंतर प्रशिक्षक गौतम गंभीर पत्रकार परिषदेत प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी पोहोचले होते. त्यांनी या मालिकेनंतर कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहली यांच्या भवितव्याबद्दलच्या प्रश्नांवर फार काही खुलून उत्तर दिलं नाही. गंभीर म्हणाले, “मी कोणत्याही खेळाडूच्या भविष्याबाबत निर्णय घेऊ शकत नाही.”

हेही वाचा – IND vs AUS: भारतीय संघावर १० वर्षांनी का ओढवली बॉर्डर गावस्कर ट्रॉफी गमावण्याची नामुष्की? वाचा भारताच्या पराभवाची कारणं

यानंतर विराट-रोहितबद्दल बोलताना गंभीर म्हणाले, “या मालिकेनंतर काय निर्णय घ्यायचा हे त्यांच्यावर आहे. हो पण मी हे सांगू शकतो की धावा करण्याची, चांगली कामगिरी करण्याची भूक अजूनही त्यांच्यात आहे. कधीही हार न मानणारे ते खेळाडू आहेत. मला आशा आहे की रोहित शर्मा आणि विराट कोहली भारतीय क्रिकेटला पुढे नेण्यासाठी आजवर जे काही आले आहेत तेच करतील. जसं मी म्हटलं ते दोघं जे काही निर्णय घेतील तो भारतीय क्रिकेटच्या हिताचा असेल.”

भारताची पुढील कसोटी मालिका जूननंतर खेळवली जाणार आहे. भारतीय संघ पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यासाठी इंग्लंडचा दौरा करणार आहे. आता कोहली आणि रोहितसारख्या अनुभवी खेळाडूंना अधिक काळ संधी द्यायची की नाही हे ठरवण्याचे आव्हान निवडकर्त्यांसमोर असेल.

Story img Loader