युवराज सिंग म्हणजे भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या भावनेशी निगडीत नाव. २००० ते २०१७ अशी तब्बल अठरा वर्ष त्याने भारतीय क्रिकेटसाठी दिली. निवृत्तीनंतरही, क्रिकेटशौकीन त्याला विसरले नाहीत. खरंतर, कधीच विस्मृतीत जाणार नाही अशी कामगिरीच युवराजने केली आहे. आपले चापल्ययुक्त क्षेत्ररक्षण, सहा चेंडूत सहा षटकार, २०११ विश्वचषकामधील लाजवाब प्रदर्शन आणि त्यानंतर कॅन्सरसारख्या आजारावर मात करत, पुन्हा त्याने भारतीय संघात पुनरागमन केले. एखाद्या चित्रपटाच्या कथेला साजेसा, असा हा प्रवास क्रिकेटप्रेमी विसरणे कसं शक्य आहे? हाच आपला युवराज आज ४१वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचा जन्म १२ डिसेंबर १९८१ साली चंडीगड येथे झाला होता. युवराजने आज त्याचा ४१वा वाढदिवस साजरा करत असताना, गंभीरने त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छामध्ये स्वतःचा आणि त्याच्या सोबत खेळतानाचा एकत्र फोटो पोस्ट केला. त्याने पोस्टला कॅप्शन दिले: “भारताकडून खेळणाऱ्या आजवरच्या सर्वोत्तम व्हाईट बॉल क्रिकेटपटूला वाढदिवसाच्या शुभेच्छा! @YUVSTRONG12” दुर्दैवाने, गंभीरने युवराज सिंगला भारताचा आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट व्हाईट बॉल क्रिकेटपटू म्हणून संबोधल्याने सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, एमएस धोनी आणि विराट कोहली यांच्यासारख्यांना नाराज केले, ज्यांनी एकदिवसीय आणि टी२० आंतरराष्ट्रीय मध्ये बरेच यश आणि दिग्गज दर्जा प्राप्त केला आहे. चाहत्यांनी गंभीरला त्याच्या मतावर ट्रोल केले आणि येथे काही अत्यंत वाईट ट्वीट्स आहेत. चाहत्यांच्या मते युवराजच्या काळात आणि सध्या खेळत असलेल्या अनेक खेळाडूमध्ये सर्वोत्तम व्हाईट बॉल क्रिकेटर चे गुण आहेत आणि ते डावलून केवळ आकसापोटी गंभीरने अशा प्रकारे शुभेच्छा दिल्या आहेत. https://twitter.com/GautamGambhir/status/1602198594001702913?s=20&t=ghwPy0vvHXkl1y755CgEwA https://twitter.com/peak_Ability14/status/1602199238364262400?s=20&t=trQP4v1yoRXOEPz1K0PUSw https://twitter.com/HitmanCricket/status/1602213671291101190?s=20&t=_hVcxl4SLZGllUBaJ2SqUg https://twitter.com/vidit2022/status/1602218690241789952?s=20&t=K8PGKXFCUM6LDhtjsjZoEg पंजाबच्या एकोणीस वर्षाखालील संघासाठी जबरदस्त कामगिरी केल्याने, युवराजची २००० सालच्या एकोणीस वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेसाठीच्या, भारतीय संघात वर्णी लागली. श्रीलंकेमध्ये झालेल्या या स्पर्धेत भारत मोहम्मद कैफच्या नेतृत्वात खेळला. अंतिम सामन्यात यजमान श्रीलंकेला हरवत, भारताने विश्वचषक जिंकला आणि स्पर्धेचा मालिकावीर होता युवराज योगराज सिंग. आपल्या अष्टपैलू खेळाने युवराजने संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतले. विश्वचषक जिंकणाऱ्या संघातील सात खेळाडूंना बेंगलोर मधील, राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत प्रवेश मिळाला. त्या सात खेळाडूंपैकी युवराज एक होता. वासू परांजपे आणि रॉजर बिन्नी यांनी त्या खेळाडूंवर मेहनत घ्यायला सुरुवात केली आणि अल्पावधीतच युवराज सिंग आणि मोहम्मद कैफ त्या दोघांच्या नजरेत भरले. त्याचवर्षी, ऑक्टोबर मध्ये ‘आयसीसी नॉक आउट ट्रॉफी’ म्हणजे आत्ताची ‘आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी’ होणार होती. त्या संघात एकोणीस वर्षाच्या युवराज सिंगची निवड झाली. गेली अनेक वर्ष ज्यांचा खेळ पाहत युवराज मोठा झाला होता त्या, सचिन, गांगुली, कुंबळे, द्रविड यांच्या समवेत तो आता ड्रेसिंगरूम शेअर करायला सज्ज झाला. भारतीय संघ या स्पर्धेसाठी केनियाला रवाना झाला होता. भारताचा पहिला सामना यजमान केनियाविरुद्ध ३ ऑक्टोबर रोजी होता. दोन दिवस सराव केल्यानंतर, सामन्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी, कर्णधार गांगुलीने युवराजला सांगितले की, “युवी, उद्या तयार रहा. भारतीय संघासाठी तू खेळतोय. मधल्या फळीमध्ये चार- पाच क्रमांकावर तुला फलंदाजी करायला मिळेल.”