टी-२० विश्वचषक २०२२ मधील ४१ वा सामना पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश संघात खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तान बांगलादेशचा ४ विकेटसने विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. परंतु या सामन्यात कर्णधार बाबर आझम आणि यष्टीरक्षक मोहम्मद रिजवान यांनी एका लाजिरवाण्या विक्रमाची नोंद केली आहे.

टी-20 विश्वचषक 2022 या मेगा स्पर्धेत दोघेही सुरुवातीपासूनच संघर्ष करताना दिसले. बांगलादेशविरुद्ध बाबर आणि रिझवान या जोडीच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रमही जमा झाला. पहिल्या विकेटसाठी दोघांनी या स्पर्धेत प्रथमच अर्धशतकीय भागीदारी केली, मात्र ती सुद्धा कासवाच्या गतीने.

Kapil Dev Says Some people will suffer but no one is bigger than the country
Kapil Dev : “काही लोकांना त्रास होईल, परंतु देशापेक्षा कोणीही…”, कपिल देव यांनी बीसीसीआयच्या ‘त्या’ निर्णयाचे केले स्वागत
Anant Radhika's Pre-Wedding Ceremony Updates in Marathi
MS Dhoni : माही साक्षीसह अनंत राधिकाच्या प्री-वेडिंग सोहळ्यासाठी जामनगरला रवाना, VIDEO होतोय व्हायरल
Ranji Trophy Mumbai's Tushar Deshpande and Tanush break the 78 year old record by scoring centuries against Baroda
Ranji Trophy : मुंबईच्या तुषार-तनुषने मोडला ७८ वर्षांपूर्वीचा विक्रम, बडोद्याविरुद्ध खेळताना रचला इतिहास
Sarfaraz Khan's Cricket Journey
Sarfaraz Khan : ‘…तर रेल्वेमध्ये कपडे विकायला जाऊ शकतो’, सर्फराझच्या वडिलांना आठवला ‘तो’ भावनिक प्रसंग

या दोघांनी पाकिस्तानसाठी ६३ चेंडूत ६७ धावांची भर घातली. आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये कोणत्याही पूर्ण सदस्य देशाने पहिल्या विकेटसाठी केलेली ही सर्वात संथ अर्धशतकी भागीदारी होती. दोघेही मैदानात असताना पाकिस्तानचा धावसंख्येचा दर प्रति षटक ५.४२ धावा होता. बाबर आझमच्या रूपाने पाकिस्तानला पहिला धक्का बसला. बाबर ३३ चेंडूत २५ धावा काढून बाद झाला. यावेळी बाबरने फक्त दोन चौकार मारले. पाकिस्तानला १०.३ षटकांत पहिला धक्का बसला आणि त्यानंतर संघाची धावसंख्या ५७ अशी झाली.

हेही वाचा – PAK vs BAN T20 World Cup : पाकिस्तानची उपांत्य फेरीत धडक, पाच गडी राखून बांगलादेशचा पराभव

बाबर ११व्या षटकात बाद झाला, तर मोहम्मद रिझवान १२व्या षटकात बाद झाला. रिझवानने ३२ चेंडूत ३२ धावा केल्या. पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील हा सामना उपांत्यपूर्व फेरीपेक्षा कमी नव्हता. कारण येथे जो संघ जिंकेल त्याला उपांत्य फेरीचे तिकीट मिळणार होती. भारताने गट २ मधून उपांत्य फेरीचे तिकीट आधीच मिळवले आहे. दुसरीकडे ग्रुप १ मधून न्यूझीलंड आणि इंग्लंडने उपांत्य फेरी गाठली आहे.