टीम इंडिया आपला‌ दुसरा टी२० विश्वचषक जिंकण्याच्या उद्देशाने ऑस्ट्रेलियात दाखल झाली होती मात्र यावेळीही पदरी निराशा आल्याने सध्या चोहीकडून संघावर टीकेचा भडीमार सुरु आहे. इंग्लंड विरुद्ध उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडने भारताला १० गडी राखून पराभूत केले त्यामुळे भारतीय संघाचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले. विजेतेपदाचे दावेदार असताना अशारीतीने पराभूत झाल्यामुळे भारतीय संघावर टीका होतेय. त्याचवेळी विश्वचषकासाठीच्या संघात समाविष्ट असलेला फिरकीपटू युजवेंद्र चहल याला संपूर्ण स्पर्धेत एकही सामना खेळायला मिळाला नाही.‌ त्यामुळे अनेकांनी संघ व्यवस्थापनाला धारेवर धरले आहे.

टीम इंडियाने विश्वचषकात सहा सामने खेळले. या सहाही सामन्यात युजवेंद्र चहलला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. विश्वचषकासाठी निवड झालेल्या भारतीय संघातील तो एकमेव असा खेळाडू राहिला ज्याला एकाही सामन्यात खेळण्यासाठी निवडले गेले नाही. ऑस्ट्रेलियातील मोठ्या मैदानांचा लाभ त्याला होईल अशी अपेक्षा ठेवून त्याची निवड केली गेलेली. मात्र, स्पर्धेदरम्यान भारतीय संघ व्यवस्थापनाने व कर्णधार रोहित शर्माने रविचंद्रन अश्विन अक्षर पटेल यांच्यावर विश्वास दाखवला.

Manoj Tiwary's statement on Shivam Dube
Team India : ‘विश्वचषकासाठी शिवम दुबेची निवड न झाल्यास CSK जबाबदार असेल..’ भारताच्या माजी खेळाडूचं मोठं वक्तव्य
IPL 2024 RR vs PBKS Match Updates in marathi
PBKS vs RR : युजवेंद्र चहलला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी! IPL मध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरणार पहिलाच गोलंदाज
Shreyas Iyer
कोलकाताचा सातत्यपूर्ण कामगिरीचा प्रयत्न! आज दिल्ली कॅपिटल्स संघाशी गाठ; श्रेयस, पंतकडे लक्ष
Rajasthan Royals vs Delhi Capitals Match Updates in marathi
IPL 2024 : दिल्लीचा संघ इतिहास रचण्याच्या तयारीत, राजस्थानविरुद्ध विजय मिळवताच पंजाबला टाकणार मागे

हेही वाचा :   T20 World Cup 2022: ‘संघाच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण…’कपिल देव यांचे संघातील बदलांवर मोठे विधान

येत्या २०२२ या संपूर्ण वर्षभरात युजवेंद्र चहल हा भारताचा सर्वोत्तम फिरकीपटू होता. त्याने या वर्षी भारतीय संघासाठी खेळताना १४ बळी मिळवलेले. तसेच यावर्षीच्या आयपीएलमध्ये देखील त्याने सर्वाधिक बळी मिळवत पर्पल कॅप आपल्या नावे केलेली. विश्वचषकापूर्वी झालेल्या सराव सामन्यात देखील तोच भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज होता.

हेही वाचा :   T20 World Cup 2022: पाकिस्तानचा माजी दिग्गज गोलंदाज वसीम अक्रमने विराट कोहलीच्या संथ खेळीवर केली टीका

विश्वचषक स्पर्धेसाठी समालोचन करणारे भारताचे माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग, इरफान पठाण, आकाश चोप्रा व रवी शास्त्री हे सातत्याने चहलला संघात स्थान देण्याविषयी बोलताना दिसले. हरभजन याने म्हटले होते की, “सध्या फलंदाजी विभागात ज्याप्रकारे कोहलीचा दर्जा आहे त्याप्रकारे फिरकी गोलंदाजीत चहलचा दर्जा दिसतो.” तर, चोप्रा व शास्त्री यांनी “भारताने ऑस्ट्रेलियातील मोठ्या मैदानाचा फायदा घेण्यासाठी चहलला संधी द्यावी असे म्हटलेले.” उपांत्य फेरीत भारतीय संघाचा पराभव झाल्यानंतर इरफानने ‘युजवेंद्र चहल’ असे ट्विट करत आपली निराशा व्यक्त केलेली. ‌तर काही चाहत्यांनी चहलला केवळ ऑस्ट्रेलिया फिरायला घेऊन गेले होते का असे म्हटले.