scorecardresearch

Premium

IND vs WI: वेस्ट इंडीजमध्ये भारतीय संघाची झाली नाचक्की, जे १७ वर्षात घडलं नाही ते हार्दिक पांड्याच्या कॅप्टन्सीखाली…

India vs West Indies: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांच्या टी२० मालिकेत हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला २-३ने पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे भारतीय संघाच्या नावावर एक नकोसा विक्रम झाला आहे.

Team India's 17 years old history spoiled 3 embarrassing records made under Hardik's captaincy
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाच्या नावावर एक नकोसा विक्रम झाला आहे. सौजन्य- (ट्वीटर)

India vs West Indies T20 Series: वेस्ट इंडिजविरुद्धच्या ५व्या टी२० सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा ८ विकेट्सनी पराभव झाला. यासह टीम इंडियाने मालिका ३-२ने गमावली. सलग १२ मालिकेनंतर ही पहिलीच वेळ आहे जेव्हा टीम इंडियाला मालिकेत पराभव पत्करावा लागला आहे, त्यामुळे भारतीय संघाची नाचक्की झाली आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा हा मोठा विक्रम एका झटक्यात मोडला. इतकंच नाही तर या मालिकेमुळे टीम इंडियाला आणखी अनेक मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागणार आहे.

१७ वर्ष जुना रेकॉर्ड मोडला

वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत पराभवामुळे टीम इंडियाचा १७ वर्ष जुना विक्रम मोडला गेला आहे. टीम इंडियाने गेल्या १७ वर्षांत वेस्ट इंडिजविरुद्ध किमान तीन सामन्यांची एकही मालिका गमावलेली नाही. मात्र येथे पराभूत झाल्यानंतर संघाच्या नावावर हा नकोसा विक्रम नोंदवला गेला असून यामुळे टीम इंडियाची मान शरमेने खाली गेली आहे.

England vs New Zealand Oneday Cricket World Cup 2023
World Cup 2023: गोळीच्या वेगाने आलेल्या चेंडूवर, जो रूटने रिव्हर्स स्वीप मारत ठोकला शानदार षटकार, पाहा VIDEO
World Cup 2023: In Hyderabad Pakistani cricketers ate biryani took selfies with fans watch the video
Pakistan Team: हैदराबादमध्ये पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी मारला बिर्याणीवर ताव, चाहत्यांबरोबर घेतले सेल्फी, पाहा Video
Asian Games 2023 IND vs MAL: Shafali Verma's brilliant half-century Team India set a challenge of 177 runs in front of Malaysia
Asian Games 2023, IND vs MAL: शफाली वर्माचे शानदार अर्धशतक! पावसामुळे सामना रद्द, टीम इंडिया चांगल्या रँकिंगच्या जोरावर पोहोचली सेमीफायनलला
Kuldeep Yadav Brutally Trolled For Going To Bageshwar Dham Dheerendra Shastri Netizens Slam Asia Cup 2023 IND vs PAK Star
“कुलदीप यादवचं नशीब चमकतंय कारण..”, धीरेंद्र शास्त्रींबरोबरचे फोटो व्हायरल; नेटकऱ्यांची सडकून टीका

२५ महिन्यांत पहिली मालिका गमावली

इतकेच नाही तर भारतीय क्रिकेट संघाने गेल्या २५ महिन्यांपासून एकही टी२० मालिका गमावलेली नाही. शेवटच्या वेळी टीम इंडियाने जुलै २०२१मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या ३ सामन्यांच्या टी२० मालिकेत २-१ असा पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर, पुढील २ वर्षे, भारतीय क्रिकेट संघाने जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात एकही टी२० मालिका गमावली नाही.

हे पहिल्यांदाच घडले

या पराभवामुळे हार्दिकच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने आणखी एक लाजिरवाणा विक्रम केला. टीम इंडियाने टी२० क्रिकेटमधील कोणत्याही मालिकेतील तीन सामने कधीही गमावलेले नाहीत. पण हे वेस्ट इंडिजमध्येही घडले. त्याचबरोबर या मालिकेतील पराभवामुळे कर्णधार हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदावर प्रथमच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच, टी२० रॅकिंगमध्येही पडझड होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: IND vs WI 5th T20: मालिका गमावल्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्याचे आश्चर्यचकित करणारे विधान; म्हणाला, “कधी कधी पराभव…”

टीम इंडियाच्या पराभवामुळे चाहते संतापले

वेस्ट इंडिजला तब्बल ७ वर्षांनंतर भारताविरुद्धची मालिका जिंकण्यात यश आले. टी२० मालिकेत भारताच्या पराभवानंतर चाहते कर्णधार हार्दिक पांड्यावर खूप निराश झाले होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांनी हार्दिक पांड्याबद्दल जहाल प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हार्दिककडून कर्णधारपद काढून घेण्याबाबत अनेकांनी मत व्यक्त केले. त्याचवेळी हार्दिक हा भारताचा भावी कर्णधार होऊ शकत नाही, असे काही लोक म्हणाले. टी२० मालिकेतील शेवटचा आणि शेवटचा सामना फ्लोरिडामध्ये खेळला गेला, ज्यामध्ये हार्दिक पांड्या फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागात अपयशी ठरला. प्रथम फलंदाजी करताना हार्दिकने १८ चेंडूत एका षटकाराच्या मदतीने केवळ १४ धावा केल्या. यानंतर त्याने ३ षटकात गोलंदाजी केली ज्यात त्याने ३२ धावा दिल्या आणि एकही विकेट मिळाली नाही.

हार्दिक सोशल मीडियावर ट्रोल होण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. टी२० मालिकेच्या सुरुवातीपासूनच भारतीय कर्णधार चाहत्यांच्या लक्ष्यावर आहे. टीम इंडियाने या मालिकेतील पहिले दोन सामने गमावले होते. यानंतर भारताने पुढील दोन सामने जिंकले, मात्र हार्दिकच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ निर्णायक सामना जिंकू शकला नाही. या पराभवानंतर चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In hardik pandyas captaincy made team indias embarrassing breaking a 17 year old record avw

First published on: 14-08-2023 at 11:20 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×