भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना अहमदाबादमध्ये खेळला जात आहे. स्पर्धेचा आज पाचवा दिवस आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४८० धावा केल्या, याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ५७१ धावा करत ९१ धावांची आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव सुरूच आहे. हा सामना अनिर्णित राहण्याची शक्यता खूप जास्त आहे. त्याच दरम्यान विराट कोहली थेट सामन्याच्या मध्यभागी अंपायर नितीन मेनन यांना टोमणे मारत होता आणि त्याचे संभाषण स्टंपच्या माईकवर पकडले गेले आहे, जे आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. या कसोटीच्या शेवटच्या दिवशी लंच ब्रेकपूर्वी एक मजेदार घटना घडली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. खरंतर, विराट कोहलीने सामन्यादरम्यानच अंपायर नितीन मेनन यांना टोमणे मारले होते. मात्र, पंच मेनन यांनी कोहलीला हसत हसत उत्तर दिले.

Ashutosh Sharma's Reaction After Defeat
‘त्या प्रशिक्षकांना मी आवडत नसे, ते मला संघात घेत नसत. यामुळे मी नैराश्यात गेलो’, आशुतोष शर्माचा संघर्ष
IPL 2024 Punjab Kings vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024: रोहित शर्माने तोडला पोलार्डचा मोठा विक्रम, मुंबईसाठी हा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024 RCB vs LSG: विराट कोहलीला आऊट करत घेतली आयपीएल कारकिर्दीतील पहिली विकेट, कोण आहे मनिमरण सिध्दार्थ?
Rishabh becomes first player to play 100th match for Delhi
IPL 2024 : ऋषभ पंतने झळकावले अनोखे ‘शतक’, दिल्ली कॅपिटल्ससाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला खेळाडू

बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेतच पंच नितीन मेननचे अनेक निर्णय विराट कोहलीच्या विरोधात गेले होते. कदाचित ही गोष्ट विराट कोहली अजून विसरला नसेल. अहमदाबाद कसोटीच्या ५व्या दिवशी संधी मिळताच विराटने फटकेबाजी केली. ही घटना ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावातील ३५व्या षटकाची आहे. त्यानंतर ट्रॅविस हेड स्ट्राइकवर होता आणि आर अश्विनच्या एका चेंडूने त्याच्याविरुद्ध एलबीडब्ल्यूचे आवाहन केले. पण, पंच नितीन मेननने हेडला नाबाद घोषित केले.

हेही वाचा: IND vs AUS 4th Test: लाबुशेनविरुद्ध किंग कोहलीची रणनीती! पीचवर जात अक्षरला दाखवली ‘ती’ जागा, पाहा Video

कोहलीने पंच नितीन मेनन यांना टोमणे मारले

यानंतर भारतीय संघाने रिव्ह्यू घेतला आणि टीव्ही रिप्ले पाहून मेनन यांना अंपायर्स कॉल घेण्याचा निर्णय सांगितला. त्यानंतर विराट कोहलीने या निर्णयावर नितीन मेनन यांना टोला लगावला. विराट म्हणाला की, “मी तिथे असतो तर नक्कीच बाहेर गेलो असतो. तो एकच गोष्ट दोनदा म्हणाला. यावर अंपायर नितीन मेनन यांनीही स्मितहास्य करत अंगठ्याचे संकेत दिले. विराटची ही चर्चा स्टंपच्या माईकमध्ये रेकॉर्ड झाली. कारण तो कॉल अंपायर्स कॉल निघाला आणि अशावेळी फिल्ड अंपायरने दिलेला निर्णय शेवटी सर्वप्रथम मनाला जातो आणि तो नाबाद असा होता तो बाद असला तर हेड बाद राहिला असता. असे कोहलीच्या बाबतीत दिल्ली आणि इंदोर कसोटीत झाले आहे म्हणून त्याने यावर उपरोधिक टोमणा मारला.

दिल्ली कसोटीतील निर्णयावर नाराज होता

बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेतील दुसऱ्या कसोटीत मॅथ्यू कुहनेमनच्या चेंडूवर विराट कोहलीला पंच नितीन मेनन यांनी एलबीडब्ल्यू आऊट केले. या निर्णयाविरोधात विराट कोहलीने आढावा घेतला होता. मात्र, टीव्ही रिप्लेमध्येही चेंडू बॅटला लागला की पॅडला, हे थर्ड अंपायर सांगू शकले नाहीत. या कारणास्तव, पंचांचा कॉल कायम ठेवण्यात आला. या निर्णयावर विराट कोहली चांगलाच नाखूष झाला असून अंपायर नितीन मेनन यांनाही ट्विटरवर ट्रोल करण्यात आले.

हेही वाचा: WTC Final: मोठी बातमी! मित्राने दिला मदतीचा हात अन् ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना जिंकण्याआधीच टीम इंडियाला मिळाले WTC फायनलचे तिकीट

अहमदाबाद कसोटीत पाचव्या दिवशी चहापानापर्यंत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या १५८/२ आहे. मार्नस लबुशेन अर्धशतक झळकावत आहे. त्याचवेळी स्टीव्ह स्मिथ त्याला साथ देत आहे. ऑस्ट्रेलियन संघ भारतापेक्षा ६७ धावांनी पुढे आहे. या सामन्याचे एकच सत्र बाकी आहे. अशा स्थितीत सामना अनिर्णित राहणे निश्चित आहे. १५३ धावांवर ऑस्ट्रेलियाची दुसरी विकेट पडली. ट्रॅविस हेड १६३ चेंडूत ९० धावा काढून बाद झाला. अक्षर पटेलने त्याला क्लीन बोल्ड केले.