Virat Kohli and Nitin Menon: विशाखापट्टणममध्ये खेळल्या गेलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये विराट कोहली पुन्हा एकदा मोठी इनिंग खेळू शकला नाही. विराटचे चाहते आणि टीम इंडियाला आशा होती की, रन मशीन कोहली या सामन्यात नक्कीच शतक करेल. विशाखापट्टणममध्ये कोहलीचा रेकॉर्डही खूप चांगला राहिला आहे पण चांगली सुरुवात करूनही कोहलीला मोठी इनिंग खेळता आली नाही. विराट ३५ चेंडूत ३१ धावा करून बाद झाला. दुसरीकडे, विराटची विकेट पडली तेव्हा अंपायर दुसरे कोणी नसून नितीन मेनन होते, त्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस सुरू झाला.

विराट कोहली स्टार्कच्या चेंडूवर LBW आऊट

वास्तविक, टीम इंडियाच्या डावाच्या पाचव्या षटकात अनुभवी गोलंदाज मिचेल स्टार्क गोलंदाजी करायला आला. या षटकातील पाचवा चेंडू त्याने कोहलीला टाकला. विराटने लेग साइडच्या खाली फटका मारण्यासाठी विकेट लाइनवर फ्लिक केला पण चेंडू पुढच्या पायाच्या पॅडला लागला. त्यानंतर गोलंदाजाने एलबीडब्ल्यूचे अपील केले आणि अंपायर नितीन मेनन यांनी त्याला बाद घोषित दिले. मेनन यांनी बाद केल्यानंतर कोहलीने रिव्ह्यू करण्याचा विचारही केला नाही आणि तो तंबूत परतला. पहिल्या एकदिवसीय डावातील एका चौकारामुळे त्याला ९ चेंडूत ४ धावा करता आल्या. विराट बाद झाल्यामुळे चाहते चांगलेच संतापले आणि त्यांनी अंपायरला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

Baramati Namo Maharojgar Melava
निमंत्रण पत्रिकेतील आणखी एक घोळ सुधारण्यासाठी प्रशासनाची धावाधाव
Kapil Dev Says Some people will suffer but no one is bigger than the country
Kapil Dev : “काही लोकांना त्रास होईल, परंतु देशापेक्षा कोणीही…”, कपिल देव यांनी बीसीसीआयच्या ‘त्या’ निर्णयाचे केले स्वागत
Nitisha Kaul sent back to uk
युकेतून भारतात आलेल्या काश्मिरी पंडित प्राध्यापिकेला इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी परत पाठवलं मायदेशी; नेमकं प्रकरण काय?
sunil gavaskar supports rohit sharma
कसोटी क्रिकेटसाठी दृढनिश्चय आवश्यक! रोहित शर्माच्या वक्तव्याचे गावस्करांकडून समर्थन

नितीन मेनन झाले ट्रोल

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात देखील विराट कोहलीला नॅथन एलिसने एलबीडब्ल्यू आऊट केले. विराट आऊट झाला तेव्हा नितीन मेनन अंपायरिंग करत होते. मेननने यांनी कोहलीला यापूर्वीही अनेकदा चुकीचे आऊट दिले आहेत. या सामन्यातही मेननने एलबीडब्ल्यूच्या अपीलवर बोट उचलण्यास उशीर केला नाही. कोहली त्या सामन्यात बाद होता पण तरीही कोहलीचे चाहते नितीन मेनन यांना ट्रोल करत आहेत.

हेही वाचा: Asia Cup 2023: टीम इंडिया पाकिस्तानला जाण्याबाबत भारत सरकारने बीसीसीआयच्या कोर्टात टाकला चेंडू, अनुराग ठाकूर यांचे मोठे विधान

सामन्यात काय झाले?

भारतीय संघ या सामन्यात मालिका जिंकण्याच्या उतरला होता. मात्र, मिचेल स्टार्कच्या नेतृत्वातील ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजी विभागाने भारतीय फलंदाजांना अक्षरशः गुडघे टेकायला भाग पाडले. स्टार्कच्या ५ बळींमुळे भारताचा डाव अवघ्या ११७ धावांवर संपुष्टात आला. या धावांचा पाठलाग करताना मिचेल मार्श व ट्रेविस हेड या दोन्ही सलामवीरांनी अर्धशतके करत संघाला दहा गडी राखून विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियन संघाने आपल्याला मिळालेले आव्हान केवळ ११ षटकांमध्ये पूर्ण केले. चेंडू राखून झालेला भारतीय संघाचा हा वनडे इतिहासातील सर्वात मोठा पराभव ठरला. भारतीय संघाला २३४ चेंडू राखून या पराभवाला सामोरे जावे लागले. यापूर्वी भारताला न्यूझीलंडकडून २१२ चेंडू राखून सर्वात मोठ्या पराभवाला तोंड द्यावे लागले होते.