IND vs AUS: ऑस्ट्रेलिया संघाला भारताविरुद्धच्या सलग दुसऱ्या कसोटी सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. पहिल्या कसोटी सामन्यात भारताने एक डाव आणि १३२ धावांनी विजय मिळवला होता. तर दुसऱ्या कसोटी सामन्यात पाहुण्या ऑस्ट्रेलियन संघाला ६ विकेट्सच्या अंतराने पराभव स्वीकारावा लागला. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज वेगवान गोलंदाज आणि संघाचा कर्णधार पॅट कमिन्स याने संघाच्या दोन चुका दाखवून दिल्या, ज्यामुळे त्यांना पराभव स्वीकारावा लागला.

दिल्लीतील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्याबद्दल रमीझ राजाने टीम इंडियाचे कौतुक केले आहे. माजी खेळाडूने सांगितले की तीन दिवसात भारताच्या विजयाने ऑस्ट्रेलिया  उपखंडातील संघांना त्यांच्या घरी पराभूत केल्याची आठवण करून दिली. राजा म्हणाले की, “नुकत्याच संपलेल्या सामन्यात फिरकीपटूंविरुद्ध १६ विकेट्स गमावल्यापासून ऑस्ट्रेलियन फलंदाज तांत्रिकदृष्ट्या कशा चुकीच्या पद्धतीने बाद झाले यावर संघ व्यवस्थापनाने विचार करणे गरजेचे आहे. अशी फलंदाजी स्पिनर्सविरुद्ध पाहून मी चक्रावून गेलो हे फार भयंकर आहे. लवकरच यात सुधारणा करणे आवश्यक आहे.”

d Gukesh defeated Nijat Abasov in the Candidates chess tournament sport news
गुकेश संयुक्त आघाडीवर! पाचव्या फेरीत अबासोववर मात; अन्य भारतीयांच्या लढती बरोबरीत
Despite the efforts of PR Sreejesh the Indian hockey team lost
श्रीजेशच्या प्रयत्नांनंतरही भारतीय हॉकी संघाचा पराभव
IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024: मयंक यादवचा सामना करायला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज उत्सुक
India Vs Pakistan bilateral series
IND vs PAK : भारत आणि पाकिस्तान यांच्यात मालिका होणार? क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आयोजनासाठी व्यक्त केली इच्छा

हेही वाचा: IND vs AUS: ऑस्ट्रेलियन संघामागील शुक्लकाष्ट काही संपेना; ५ खेळाडू भारत सोडणार, २ परतणार नाहीत, एकाचे करिअर धोक्यात!

रमीझ राजांची ऑस्ट्रेलियन संघावर सडकून टीका

रमीझ राजा म्हणाले, “ऑस्ट्रेलिया स्वतःच्या कृतीचे फळ भोगत आहे. ते पर्थ किंवा ब्रिस्बेनमधील आशियाई संघांना तीन दिवसांत हरवून खेळ संपवायचे. भारतात चांगले क्रिकेट खेळण्याचा प्रश्न येतो तेव्हा ऑस्ट्रेलियन खेळाडू तयार नसतात. तुमच्या देशात म्हणजेच इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीजमध्ये जसे आशियाई संघांना वागवतात तसेच त्यांची अवस्था इथे होते. मी खेळपट्ट्यांबाबत बोलत आहे.”

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष भारताचे कौतुक करताना म्हणाले की, “अक्षर पटेलने अश्विनसोबत केलेली ११५ धावांची भागीदारी केली हा खेळाचा टर्निंग पॉइंट होता. अक्षर पटेलने ७० धावा केल्या आणि रविचंद्रन अश्विनसोबत सामना जिंकण्याची भागीदारी केली. ऑस्ट्रेलियन खेळाडू अप्रस्तुत होते आणि फिरकीपटूंविरुद्ध त्यांची कामगिरी खराब होती.” राजा पुढे म्हणाले की, “पाकिस्तानच्या विपरीत, भारताने केवळ खेळण्याची परिस्थितीच योग्य ठेवली नाही तर खेळातील त्यांच्या रणनीतींनाही पाठिंबा दिला.”

हेही वाचा: INDW vs IREW T20 WC: भारतासाठी आजचा सामना ‘करो या मरो’! उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी आयर्लंडवर विजय आवश्यक, जाणून घ्या प्लेईंग-११

रमीझ पुढे म्हणाले, “भारताला फिरकीच्या खेळपट्ट्यांवर हरवणे जवळजवळ अशक्य आहे. बीसीसीआयची रणनीती खूप यशस्वी झाली आहे. पाकिस्ताननेही फिरकीचे ट्रॅक तयार करून प्रतिस्पर्ध्याला हरवण्याचा प्रयत्न केला, मात्र तसे झाले नाही. भारताला केवळ परिस्थितीची साथ मिळाली नाही तर त्यांनी ऑस्ट्रेलियन फलंदाजी आक्रमणाचा धुव्वा उडवत स्वतःच्या गोलंदाजांवरील प्रतिभेवरही भरवसा ठेवला.”