विशाखापट्टणमच्या मैदानात अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर ३ गडी राखून मात करत मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. १२७ धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाला जसप्रीत बुमराहने मोक्याच्या क्षणी बॅकफूटवर नेलं. अखेरच्या षटकात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १४ धावांची गरज होती, मात्र उमेश यादव हे आव्हान पेलण्यात अयशस्वी ठरला. ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी आव्हान पूर्ण करत सामन्यात बाजी मारली. यानंतर लगेचच सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी उमेश यादवची अक्षरशः धुलाई केली.