India vs England t20 : कसोटी मालिका पार पडल्यानंतर भारत आणि इंग्लंड आता टी २० सामन्यांमध्ये आपापली क्षमता सिद्ध करण्यासाठी जोर लावणार आहे. दोन्ही संघांदरम्यान तीन सामन्याची टी २० मालिका सुरू झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना साउथॅम्प्टनमधील 'द रोज बाऊल' स्टेडियममध्ये पार पडला. ५० धावांनी भारताने हा सामना जिंकला. परिणामी भारताला तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी मिळाली आहे. निर्धारित २० षटकांमध्ये भारताने आठ बाद १९८ धावा केल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर म्हणून इंग्लंडला सर्वबाद १४८ धावांपर्यंत मजल मारता आली.