भारत आणि न्यूझीलंड संघातील तीन सामन्यांची वनडे मालिका पार पडली आहे. या मालिकेतील पहिला सामना यजमान न्यूझीलंड संघाने जिंकला होता. त्यानंतर सलग दोन सामने पावसामुळे रद्द झाले. ज्यामुळे न्यूझीलड संघाने ही मालिका १-० अशा फरकाने जिंकली. तीन सामन्यांची वनडे मालिका गमावल्यानंतर कर्णधार शिखर धवनने आपली प्रतिक्रिया देताना, पराभवाचे कारण देखील स्पष्ट केले आहे.

ख्राइस्टचर्चच्या हॅगली ओव्हलवर खेळल्या गेलेल्या वनडे मालिकेत बरोबरी साधण्याची भारताची शक्यता पावसामुळे संपुष्टात आली. भारताचा कर्णधार शिखर धवनला वाटते की पाहुण्या संघाच्या गोलंदाजीने तीन सामन्यांच्या स्पर्धेत अपेक्षेपेक्षा जास्त शॉर्ट गोलंदाजी केली.

Rr Vs Gt Ipl 2024 Sanju Samson 50th Match As Captain
RR vs GT : संजू सॅमसनने ५०व्या सामन्यात केला खास पराक्रम, ‘या’ बाबतीत रोहित शर्मासह तीन कर्णधारांना टाकले मागे
Despite the efforts of PR Sreejesh the Indian hockey team lost
श्रीजेशच्या प्रयत्नांनंतरही भारतीय हॉकी संघाचा पराभव
Virat Reveals Time Spent With Family
IPL 2024 : ‘लोक आम्हाला ओळखत नव्हते’, विराट कोहली दोन महिने कुठे होता? स्वत:च उघड केले गुपित
Virat Kohli and Rachin Ravindra Video Viral
CSK vs RCB : सामन्यादरम्यान कोहलीने पुन्हा उत्साहात गमावले भान, रचिन बाद झाल्यावर अशी दिली प्रतिक्रिया, पाहा VIDEO

बुधवारी तिसऱ्या सामन्याचा कोणताही निकाल न लागल्याने भारताने मालिका १-० ने गमावली. ऑकलंडमधील एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात सात विकेट्सने झालेला पराभव मालिकेतील टर्निंग पॉइंट ठरला. उमरान मलिक, अर्शदीप सिंग, दीपक चहर, शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर आणि युझवेंद्र चहल या एकमेव अनुभवी गोलंदाजांसोबत भारतीय संघ मालिकेत उतरला होता.

सामन्यानंतरच्या सादरीकरण समारंभात बोलताना धवन म्हणाला, ”आम्ही युवा संघ आहोत. नक्कीच, गोलंदाजी युनिटला चांगल्या लांबीच्या भागात गोलंदाजीबद्दल थोडे अधिक शिकण्याची आवश्यकता आहे. मला वाटते की आम्ही जरा जास्तच शॉर्ट गोलंदाजी केली. गोलंदाजीत जरा जास्त सातत्य ठेवावे लागेल. तसेच शॉर्ट आणि बाऊन्स जास्त वापरावे लागतील. या अनुभवांतून युवा गोलंदाज शिकतील.”

सुरुवातीच्या षटकांमध्ये स्विंग आणि सीम कमी झाल्यानंतर फलंदाजांसाठी धवनला मोठी भागीदारी करण्याची गरज भासू लागली. तसेच फलंदाजीतही भागीदारी आणखी वाढवण्याची गरज आहे. सुरुवातीपासूनच विकेटवर उसळी होती. पण जेव्हा तुम्ही न्यूझीलंडमध्ये येता तेव्हा तुम्हाला तेच अपेक्षित असते, विशेषत: जेव्हा ते सतत ढगाळ वातावर असते. इथे आल्यावर तुमची अपेक्षा असते, असे धवन म्हणाला.

आगामी तीन सामन्यांच्या मालिकेसाठी बहुतांश युवा खेळाडू बांगलादेशला जाणार नाहीत. न्यूझीलंडमधील मालिकेतून शिकणे हे फलंदाज आणि गोलंदाज दोघांसाठीही फायदेशीर ठरेल, असे धवनला वाटते.

हेही वाचा – IND vs NZ 3rd ODI: पावसामुळे मालिकेतील तिसरा सामना रद्द! न्यूझीलंडने १-० ने मालिका घातली खिशात

तो म्हणाला, ”जर आपण बॉलिंग युनिटबद्दल बोलत आहोत, तर तुम्हाला समजले आहे की ठीक आहे, बॉल कुठे पिच करायचा आणि कोणत्या लांबीने तुम्हाला सातत्यपूर्ण गोलंदाजी करायची आहे. या गोष्टी साध्या आहेत. पण युवा गोलंदाज अजूनही दडपण हाताळायला शिकत आहेत.”