वेलिंग्टनमध्ये पावसाने सुरू झालेला भारताचा दौरा क्राइस्टचर्चमध्ये पावसानेच संपला. कारण भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना पावसामुळे रद्द झाला. पहिल्या टी-२० सामन्यापासूनच पावसाने संपूर्ण मालिकेत खेळ खराब केला. पावसाच्या प्रभावाचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की सहा पैकी फक्त दोनच सामने पूर्ण होऊ शकले. त्याचबरोबर इथे थंडी जास्त असल्याने काही भारतीय खेळाडू टोपी घालून क्षेत्ररक्षण करत होते. त्यावर माजी खेळाडू अजय जडेजाने प्रतिक्रिया दिली आहे.

थंडी इतकी होती की सूर्यकुमार यादव आणि दीपक चहर सारखे भारतीय खेळाडू टोपी घालून क्षेत्ररक्षण करताना दिसले. भारतीय क्षेत्ररक्षकांनी टोपी घालणे काही नवीन नाही. कारण या वर्षाच्या सुरुवातीला आयर्लंड दौऱ्यात दिनेश कार्तिक आणि हार्दिक पांड्यासारखे खेळाडू असे दिसले होते. परंतु भारतीय क्रिकेटपटू त्यांचे बहुतांश क्रिकेट थोड्याशा उष्ण परिस्थितीत खेळत असल्याने, बीनीज येण्याआधी ही वेळ होती.

Rohit Sharma Is My Captain Not Other Guy Hardik Pandya
“रोहित शर्माच्या सल्ल्यावरच MI च्या खेळाडूंचा..”, इरफान पठाणने सांगितला ‘त्या’ Video चा अर्थ; म्हणाला, “हार्दिकपेक्षा..”
miller mathew
“दहशतवाद्यांना घरात घुसून मारू”, मोदींच्या वक्तव्यावर अमेरिकेची प्रतिक्रिया; म्हणाले, “भारत-पाक वादात आम्हाला…”
Ambati Rayudu explains why RCB didn't win a IPL trophy for 16 years
आरसीबीच्या खराब कामगिरीसाठी अंबाती रायुडूने वरिष्ठ खेळाडूंना धरले जबाबदार; म्हणाला, “जेव्हा संघाला गरज असते, तेव्हा…’
Mayank bowls the fastest ball in IPL 2024
LSG vs PBKS : बुमराह किंवा शमीला नव्हे, तर दक्षिण आफ्रिकेच्या ‘या’ खेळाडूला मयंक यादव मानतो आपला आदर्श

भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजाला वाटते की, सध्याच्या खेळाडूंचे पीक टीम इंडियाला अधिकृत बीनी मिळणे भाग्यवान आहे. सूर्यकुमार आणि चहरचे क्षेत्ररक्षण पाहताना जडेजाने सांगितले की, एक दशकापूर्वी भारतीय क्रिकेटमध्ये असेच दृश्य दिसले असते, तर त्या खेळाडूसाठी तो रस्ता संपला असता.

पावसामुळे खेळात व्यत्यय आल्यानंतर तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान त्याने प्राइम व्हिडिओला सांगितले, “सुदैवाने त्यांच्यासाठी, ते टोपी घालू शकतात. १०-१५ किंवा २० वर्षांपूर्वी मागे जा, कल्पना करा की भारतीय संघातील कोणीतरी टोपी घालून मैदानात आला, तर आम्ही तो खेळाडू पुन्हा कधीही पाहिला नसता. कारण आम्हाला म्हणाले असते की, कॅपचा आणि त्यासारख्या गोष्टीचा अनादर करण्यासारखे आहे. या खेळाडूंनी ती परिधान केलेली पाहून मला आनंद झाला.”

न्यूझीलंडने घरच्या मैदानावर त्यांची अपराजित राहण्याची मालिका सुरू ठेवली आहे. कारण त्यांनी भारताविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका १-० ने जिंकली. सामन्यानंतर, न्यूझीलंडच्या टॉम लॅथमने थंड परिस्थितीची दखल घेतली आणि भारतीय खेळाडूंना टोपी घालून क्षेत्ररक्षण करण्यावर आपले मत व्यक्त केले.

हेही वाचा – Fifa World Cup 2022: पेनल्टीवर मी गोल का करू शकलो नाही? स्वत:च्या अपयशामुळे मेस्सी हैराण

न्यूझीलंडचा यष्टीरक्षक सामन्यानंतरच्या सादरीकरण समारंभात म्हणाला, “अहो, इतकी थंडी आहे का? आमच्यासाठी तर नक्कीच थंडी नाही, पण त्यांच्यासाठी खूप थंडी आहे.” कारण भारतीय संघ इतक्या थंड हवामनाच्या ठिकाणी जास्त क्रिकेट खेळत नाही. त्यामुळे त्यांना सवय नाही. तसेच भारतातील हवामान न्यूझीलंडपेक्षा खूप वेगळे आहे.