भारत आणि श्रीलंका संघात मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तसेच भारतीय संघाने विराट कोहलीच्या नाबाद दीड शतकाच्या जोरावर श्रीलंकेला ३९१ धावांचे लक्ष्य दिले. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने ४२ धावा केल्या. त्याचबरोबर रोहित शर्माने एक विक्रम केला आहे. ज्यामध्ये त्याने एबी डिव्हिलियर्सला मागे टाकले आहे.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा डिव्हिलियर्सच्या पुढे गेला आहे. हिटमॅन रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्ध त्रिवेंद्रम येथे सुरू असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ही कामगिरी केली.

Dinesh Karthik Says I won't be surprised if he crosses the 300 run mark in IPL
IPL 2024 : आयपीएलमध्ये लवकरच ३०० धावांचा टप्पा पार होणार, ‘या’ दिग्गज खेळाडूची मोठी भविष्यवाणी
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
MI vs CSK: आयपीएल २०२४ मध्ये ऋतु’राज’, मुंबईविरूद्ध विस्फोटक फलंदाजीसह ‘हा’ विक्रम करणारा पहिला भारतीय खेळाडू
Kolkata Knight Riders vs Delhi Capitals Match Highlights in Marathi
IPL 2024, DC vs KKR : कोलकाता नाईट रायडर्सचा मोठा विजय! दिल्ली कॅपिटल्सचा तब्बल १०६ धावांनी उडवला धुव्वा
IPL 2024 Lucknow Super Giants vs Punjab Kings Match Updates in Marathi
IPL 2024: सर्वात वेगवान चेंडू टाकणारा मयंक यादव आहे तरी कोण?

रोहित शर्माने तिसऱ्या सामन्यात २४वी धाव घेताच केल्यामुळे वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या एबी डिव्हिलियर्सला मागे टाकले. डिव्हिलियर्सने वनडे क्रिकेटमध्ये ९५७७ धावा केल्या आहेत, तर रोहित शर्माने या सामन्यापूर्वी ९५५४ धावा केल्या होत्या. तिसऱ्या सामन्यादरम्यान त्याने डिव्हिलियर्सला मागे टाकले.

वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित शर्मा आता १७व्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचबरोबर या यादीत तो सहावा भारतीय आहे. या मालिकेत रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ९५०० धावांचा टप्पा पार केला. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तीन द्विशतके झळकावणारा तो जगातील एकमेव खेळाडू आहे. या सामन्यात रोहित शर्माने ४९ चेंडूत ४२ धावांची खेळी केली. रोहितने या खेळीत २ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ४२ धावा केल्या. रोहित त्याच्या आवडत्या शॉटवर स्क्वेअर लेगला झेलबाद झाला.

सामन्याबद्ल बोलायचे तर, भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद ३९० धावा केल्या. भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ११० चेंडूत नाबाद १६६ धावा केल्या. त्याचबरोबर श्रेयस अय्यरने ३८ धावांचे योगदन दिले.