R. Ashwin on Rohit Sharma: भारताने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दणदणीत विजय नोंदवला. टीम इंडियाने मालिकेत २-० अशी अजेय आघाडी कायम ठेवली आहे. त्याचवेळी पहिल्या एकदिवसीय सामन्यादरम्यान घडलेली एक घटना सतत चर्चेचा विषय ठरत आहे. ज्यामध्ये संघाचा कर्णधार रोहित शर्माने आपले मोठे मन दाखवत पाहुण्या संघाचा कर्णधार दासून शनाकाचे शतक केले. पण टीम इंडियाचा फिरकी मास्टर अश्विन याला हिटमॅनची उदारता आवडली नाही. या प्रकरणाला हवा देत त्यांनी आपली प्रामाणिक प्रतिक्रिया दिली आहे.

आर. अश्विन मांकडिंगवर अनेकदा रनआऊटबाबत बोलताना दिसतो. यावेळी तो त्याच्याच संघाबाबत होता, तरीही अश्विनने याबाबत मौन सोडले आहे. वास्तविक, दुसरा एकदिवसीय सामना पूर्णपणे भारताच्या ताब्यात होती. शेवटच्या षटकात चेंडू मोहम्मद शमीच्या हातात होता. त्याचवेळी श्रीलंकेचा कर्णधार दुसऱ्या टोकाला ९८ धावांवर उभा होता. पण शमीने गोलंदाजी करण्यापूर्वी तो क्रीज सोडला आणि शमीने त्याला सोडले नाही. मात्र कर्णधार रोहित शर्माने मोठे मन दाखवत अपील मागे घेतले. तो सामन्यानंतर म्हणाला की तो ९८ धावांवर फलंदाजी करत होता, आम्ही त्याला अशा प्रकारे बाद करू शकत नाही. पण हिटमॅनच्या या निर्णयावर अश्विन उघडपणे बोलला आहे.

IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: लवकरच सगळेजण हार्दिक पंड्याचे गोडवे गातील; कायरॉन पोलार्ड हार्दिकच्या मागे भक्कम उभा
Rohit first Indian to hit 500 sixes
MI vs CSK : रोहित शर्माने रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणत्याच भारतीय खेळाडूला जमलं नाही ते करून दाखवलं
Who is Angkrish Raghuvanshi
IPL 2024 : कोण आहे अंगक्रिश रघुवंशी? ज्याने सुनील नरेनच्या साथीने दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांची केली धुलाई
Mohit Sharma on Ravi Shastri's Comment
GT vs SRH : वयांवरुन खिल्ली उडवणाऱ्या रवी शास्त्रींना मोहित शर्माचे चोख प्रत्युत्तर; म्हणाला, ‘माझं वय वाढतंय…’

हेही वाचा: IND vs SL 3rd ODI: अखेर उत्तरायणात ‘सुर्या’चा संघात प्रवेश! प्लेइंग इलेव्हनमध्ये कर्णधार रोहितने केले दोन मोठे बदल

खेळाडूला बाद करण्याचा हाच एक पर्याय असतो- अश्विन

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातील घटनेबाबत अश्विन म्हणाला, “शनाका ९८ धावांवर फलंदाजी करत होता, त्यानंतर शमीने त्याला दुसऱ्या टोकाला धावबाद केले आणि नंतर अपीलही केले. रोहितने ते अपील मागे घेतले. त्यानंतर अनेकांनी यावर ट्विट केले. मी फक्त एका गोष्टीची पुनरावृत्ती करत आहे मित्रांनो, खेळाची परिस्थिती महत्त्वाची नाही. बाहेर पडण्याचा हा एक परिपूर्ण मार्ग आहे.”

“रोहितने ती अपील मागे घेतली. त्यानंतर अनेकांनी ट्वीट केले. मी पुन्हा एकदा सांगतो तसे बाद करणे काही चुकीचे नाही. पायचीत किंवा झेलबाद आहे की नाही हे विचारण्यासाठी कोणीही कर्णधाराला कौन बनेगा करोडपतीमधील सरथ कुमार किंवा अमिताभ बच्चन यांच्यासारखे प्रश्न विचारणार नाही की तो खरच बाद आहे का नाही?”, असेही अश्विन म्हणाला.

हेही वाचा: IND vs SL 3rd ODI: इशान-सुर्याला न मिळणाऱ्या संधीबाबत टीम इंडियाच्या प्रशिक्षकाने मौन सोडले, म्हणाले “इतरांची कामगिरी…”

शेवटच्या षटकात हाय व्होल्टेज ड्रामा झाला होता

शेवटच्या षटकात जेव्हा श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका ९८ धावांवर खेळत होता आणि शतकापासून फक्त दोन धावा दूर होता. त्यानंतर मोहम्मद शमीने त्याला नॉन स्ट्रायकर एंडवर धावबाद केले. मात्र नंतर कर्णधार रोहित शर्माने अपील मागे घेतले. त्यामुळे शनाका शतक पूर्ण करू शकला, पण तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही आणि भारताने ६७ धावांनी विजय मिळवला.