IND vs WI 3rd T20 News in Marathi, 01 August 2022 : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात पाच सामन्यांची टी २० मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसरा सामना मंगळवारी (२ ऑगस्ट) रोजी सेंट किट्समधील बॅस्टेअर वॉर्नर पार्क येथे झाला. या सामन्यात भारताने वेस्ट इंडीजचा सात गडी राखून पराभव केला. भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे यजमान वेस्ट इंडीजला सुरुवातीला फलंदाजी करावी लागली. निर्धारित २० षटकांमध्ये विंडीजने कायले मेयर्सच्या अर्धशतकाच्या बळावर पाच बाद १६४ धावा केल्या होत्या. भारताने १९ षटकांमध्ये तीन गड्यांच्या बदल्यात हे लक्ष्य पार केले.