India Women (IND-W) vs Sri Lanka Women (SL-W) 4th T20I Highlights: भारतीय संघाने २२१ धावांचा डोंगर उभारला. स्मृती मानधनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०,००० धावांचा टप्पा ओलांडला. हा टप्पा ओलांडणारी ती केवळ चौथी फलंदाज आहे. स्मृती-शफाली जोडीने १६२ धावांची खणखणीत सलामी दिली. स्मृतीने ४८ चेंडूत ११ चौकार आणि ३ षटकारांसह ८० धावा केल्या. शफालीने ४६ चेंडूत १२ चौकार आणि एका षटकारासह ७९ धावा केल्या. ऋचा घोषने १६ चेंडूत ४० धावा केल्या.
श्रीलंकेने कर्णधार चामरी अट्टापट्टूच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर १९१ धावांची मजल मारली. पहिल्या तीन लढतींच्या तुलनेत श्रीलंकेच्या फलंदाजांची कामगिरी सुधारली. भारतातर्फे अरुंधती रेड्डी आणि वैष्णवी शर्मा यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. या विजयासह भारतीय संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत ४-० अशी आघाडी घेतली आहे. पाचवा आणि अंतिम सामना मंगळवारी होणार आहे.

भारत विरुद्ध श्रीलंका चौथा टी२० सामना हायलाईट्स
भारताचं चले चलो
भारतीय संघाने २२१ धावांचा डोंगर उभारला. स्मृती मानधनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०,००० धावांचा टप्पा ओलांडला. हा टप्पा ओलांडणारी ती केवळ चौथी फलंदाज आहे. स्मृती-शफाली जोडीने १६२ धावांची खणखणीत सलामी दिली. स्मृतीने ४८ चेंडूत ११ चौकार आणि ३ षटकारांसह ८० धावा केल्या. शफालीने ४६ चेंडूत १२ चौकार आणि एका षटकारासह ७९ धावा केल्या. ऋचा घोषने १६ चेंडूत ४० धावा केल्या.
श्रीलंकेने कर्णधार चामरी अट्टापट्टूच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर १९१ धावांची मजल मारली. पहिल्या तीन लढतींच्या तुलनेत श्रीलंकेच्या फलंदाजांची कामगिरी सुधारली. भारतातर्फे अरुंधती रेड्डी आणि वैष्णवी शर्मा यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. या विजयासह भारतीय संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत ४-० अशी आघाडी घेतली आहे. पाचवा आणि अंतिम सामना मंगळवारी होणार आहे.
टीम इंडिया विजयी
भारतीय संघाने सांघिक कामगिरीच्या बळावर श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या टी२० लढतीत विजय मिळवला.
श्रीलंका पराभवाच्या दिशेने
भारतीय क्षेत्ररक्षकांकडून झालेल्या ढिसाळ क्षेत्ररक्षणानंतरही श्रीलंकेला लक्ष्य गाठणं अवघड आहे.
श्रीलंकेची गती मंदावली
वेगवान सलामीनंतर श्रीलंकेची धावगती मंदावली आहे. त्यांनी दोन विकेट्सही गमावल्या आहेत. कर्णधार चामरी अट्टापट्टू ३७ चेंडूत ५२ धावा करुन तंबूत परतली आहे.
श्रीलंकेने धावांचा पाठलाग करताना ११ व्या षटकात १०० धावांचा पल्ला गाठला आहे.
श्रीलंकेचीही जोरदार सुरुवात
डोंगराएवढ्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेने आक्रमक सुरुवात केली आहे.
टीम इंडिया २२१
स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांच्या दमदार खेळींच्या बळावर भारतीय संघाने निर्धारित २० षटकात २२१ धावांचा डोंगर रचला. स्मृतीने ४८ चेंडूत ८० तर शफालीने ४६ चेंडूत ७९ धावांची खेळी केली. ऋचा घोषने या पायावर कळस चढवत १६ चेंडूत ४० धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीत कौरने १० चेंडूत १६ धावा केल्या.
ऋचा घोषने एका षटकात चोपल्या २३ धावा
ऋचा घोषने श्रीलंकेच्या गोलंदाजांचा समाचार घेत एका षटकात २३ धावा कुटल्या.
शफालीपाठोपाठ स्मृतीही तंबूत; शतकाचं स्वप्न भंगलं
शफालीबरोबरीची भागीदारी संपुष्टात येताच स्मृती मानधनाही बाद झाली आहे. स्मृतीने ४८ चेंडूत ८० धावांची खेळी केली.
शफालीचा झंझावात थांबला
४६ चेंडूत ७९ धावांची वेगवान खेळी करून शफाली वर्मा बाद झाली. या खेळीत १२ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता.
टीम इंडिया दीडशेपल्याड
स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांच्या वादळी खेळींच्या बळावर भारतीय संघाने दीडशेचा टप्पा ओलांडला.
स्मृती मानधनाचं अर्धशतक, आता सर्वाधिक षटकारांचा विक्रमही नावावर
स्मृती मानधनाने ३५ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. भारतासाठी सर्वाधिक षटकारांचा विक्रमही तिने नावावर केला.
टीम इंडियाची शंभरी, शफालीने पार केला अर्धशतकाचा टप्पा
शफाली वर्माच्या तडाखेबंद फटकेबाजीच्या जोरावर भारतीय संघाने ११व्या षटकातच शंभरीचा टप्पा ओलांडला आहे.
१०,००० धावांचा टप्पा कमीत कमी डावात
स्मृती मानधनाने सगळ्यात कमी इनिंग्ज अर्थात डावांमध्ये २८१ मध्ये १०,००० आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा ओलांडला.
स्मृती मानधना दस हजारी मनसबदार
स्मृती मानधनाने श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या टी२० लढतीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०,००० धावांचा टप्पा ओलांडला. हा विक्रम करणारी ती केवळ चौथी खेळाडू आहे. मिताली राज, चार्लोट एडवर्ड्स, सुजी बेट्स यांच्या मांदियाळीत आता स्मृतीचा समावेश झाला आहे.
शफाली वर्माची चौकारांची आतषबाजी
दोन लढतीत श्रीलंकेच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेणाऱ्या शफाली वर्माने चौथ्या लढतीतही फॉर्म कायम राखत चौकारांची लयलूट केली.
पहिल्याच ओव्हरमध्ये १० धावा
स्मृती मानधनाने पहिल्याच ओव्हरमध्ये २ चौैकार लगावत भारतीय संघाला सकारात्मक सुरुवात करून दिली.
श्रीलंकेचा कर्णधार चामरी अट्टापट्टूचा दीडशेवा टी२० सामना
श्रीलंकेची कर्णधार चामरी अट्टापट्टू १५०वा टी२० सामना खेळत आहे. श्रीलंकेने माल्की मादरा आणि इनोका रनवीरा यांना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. काव्या काविंदी आणि रश्मिका यांना अंतिम अकरात जागा मिळाली आहे.
श्रीलंकेचा संघ- चामरी अट्टापट्टू, हसिनी परेरा, हर्षिता समराविक्रमा, कविशा दिलहारी, निल्हाशिका सिल्व्हा, इमेशा दुलानी, कौशिनी नुत्यांगना, मलाशा स्नेहानी, रश्मिका सेवांदी, काव्या काविंदी, निमाशा मीपगे.
भारतीय संघात दोन बदल- जेमिमा, क्रांतीऐवजी अरुंधती रेड्डी आणि हरलीन देओल
तब्येत ठीक नसल्यामुळे जेमिमा रॉड्रिग्ज या लढतीत खेळत नाहीये तर क्रांती गौडला विश्रांती देण्यात आली आहे. त्यांच्याऐवजी अरुंधती रेड्डी आणि हरलीन देओल यांना अंतिम अकरात स्थान देण्यात आलं आहे.
भारतीय संघ- शफाली वर्मा, स्मृती मानधना, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर, ऋचा घोष, दीप्ती शर्मा, अमनज्योत कौर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग, वैष्णवी शर्मा, श्री चरणी
श्रीलंकेने टॉस जिंकला, बॉलिंगचा निर्णय
चौथ्या टी२० लढतीत श्रीलंकेची कर्णधार चामरी अट्टापट्टूने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला आहे.
तिसऱ्या लढतीसह टीम इंडियाने जिंकली मालिका
तिसऱ्या लढतीत श्रीलंकेचा डाव एकदमच गडबडला. त्यांना ११२ धावाच करता आल्या. रेणुका सिंगने २१ धावांच्या मोबदल्यात ४ विकेट्स पटकावल्या. दीप्ती शर्माने ३ विकेट्स घेत रेणुकाला चांगली साथ दिली. शफालीने पुन्हा एकदा तडाखेबंद खेळी साकारली. तिने ४२ चेंडूत ११ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ७९ धावांची खेळी केली. या विजयासह भारतीय संघाने मालिका जिंकली.
शफालीचा दणका श्रीलंकेला भारी
दुसऱ्या सामन्यातही श्रीलंकेला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यांनी १२८ धावांची मजल मारली. हर्षिता समराविक्रमाने ३३ तर कर्णधार चामरी अट्टापट्टून ३१ धावा केल्या. बाकी फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. भारतातर्फे वैष्णवी शर्मा आणि श्री चरणी यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. शफाली वर्माने ३४ चेंडूत नाबाद ६९ धावांची दिमाखदार खेळी साकारली. यामध्ये ११ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. जेमिमा रॉड्रिग्जने २६ धावांची खेळी करत तिला चांगली साथ दिली.
भारताच्या विजयात जेमिमा चमकली
पहिल्या लढतीत श्रीलंकेला १२१ धावाच करता आल्या. विश्मी गुणरत्नेने ३९ धावा केल्या. भारतीय संघाने जेमिमा रॉड्रिग्जच्या ४४ चेंडूत ६९ धावांच्या खेळीच्या बळावर ८ विकेट्स राखून विजय मिळवला. जेमिमाच्या खेळीत १० चौकारांचा समावेश होता.
आज चौथी लढत
भारत आणि श्रीलंका महिला संघांदरम्यान आज चौथा टी२० सामना तिरुवनंतपुरम इथे होत आहे.
