पीटीआय, हैदराबाद : गेल्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधल्यानंतर भारतीय संघाचे रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या आणि अखेरच्या ट्वेन्टी-२० सामन्यात विजय नोंदवत मालिका जिंकण्याचे लक्ष्य आहे. या सामन्यात हर्षल पटेल आणि यजुर्वेद्र चहल या भारताच्या दोन प्रमुख गोलंदाजांच्या कामगिरीवरही सर्वाची नजर असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताने नागपूर येथे झालेला दुसरा ट्वेन्टी-२० सामना सहा गडी राखून जिंकला असला तरी आठ-आठ षटकांच्या झालेल्या या सामन्यात हर्षल आणि चहल यांनी निराशा केली. ट्वेन्टी-२० विश्वचषकापूर्वी या दोन्ही गोलंदाजांना लय सापडणे भारतासाठी महत्त्वाचे आहे. यासह अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारलाही सूर गवसलेला नाही. हर्षलमध्ये दुखापतीतून पुनरागमन करताना आत्मविश्वासाची कमतरता जाणवली. हर्षलला या मालिकेत एकही बळी मिळवता आलेला नाही.  दुसरीकडे,  गोलंदाजांची कामगिरी ऑस्ट्रेलियासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. पहिल्या सामन्यात फलंदाजांच्या कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने विजय नोंदवला, तर दुसऱ्या सामन्यात  गोलंदाजांना धावांचा बचाव करता आला नाही. 

  • वेळ : सायं.७ वा.  ’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India australia twenty20 series india targets series win third match australia today ysh
First published on: 25-09-2022 at 00:05 IST