लंडन : क्रिकेटची पंढरी अशी ख्याती असलेल्या लॉर्ड्स मैदानावर भारतीय महिला संघाने शनिवारी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीला निर्भेळ यशाची भेट दिली. तिसऱ्या व अखेरच्या एकदिवसीय सामन्यात भारताने इंग्लंडला १६ धावांनी पराभूत केले. यासह भारताने मालिका ३-० अशी जिंकली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय महिला संघाचा डाव ४५.४ षटकांत १६९ धावांत आटोपला होता. स्मृती मानधना (५०), दिप्ती शर्मा (नाबाद ६८) व पूजा वस्त्राकार (२२) या तीन भारतीय फलंदाजांनाच दोन आकडी मजल मारता आली. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची ७ बाद ६५ अशी स्थिती झाली होती. मात्र, चार्ली डिनने इंग्लंडच्या विजयासाठी प्रयत्न केले. पण, अखेरीस चार्लीच धावबाद झाली आणि इंग्लंडचा डाव १५३ धावांवर संपुष्टात आला. भारताकडून रेणुका सिंगने २९ धावांत ४ गडी तर, आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील अखेरचा सामना खेळणाऱ्या झुलनने दोन बळी मिळवले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India england odi series success indian women team won ysh
First published on: 25-09-2022 at 01:45 IST