पीटीआय, नवी दिल्ली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुद्धिबळ खेळात भारताने चांगली प्रगती केली आहे आणि योग्य दिशेने त्यांची वाटचाल सुरू आहे. एकूणच बुद्धिबळात भारत सर्वश्रेष्ठ बनण्यास फार वेळ लागणार नाही, असे मत पाच जगज्जेतेपद मिळवणाऱ्या मॅग्नस कार्लसनने व्यक्त केले.कार्लसन सध्याचा जलदगती प्रकारातील जगज्जेता असून, सध्याच्या पिढीतील एक लोकप्रिय खेळाडू आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या पहिल्या ग्लोबल चेस लीगसाठी टेक महिंद्रा आणि जागतिक बुद्धिबळ संघटनेने कार्लसनला करारबद्ध केले. त्या वेळी बोलताना कार्लसनने भारतातील बुद्धिबळ प्रगतीचे कौतुक केले. ‘‘भारतीय बुद्धिबळ खेळाडू खूप चांगली कामगिरी करत आहेत. जागतिक स्तरावर भारतीय खेळाडूंची चांगली छाप आहे. गेल्या वर्षी भारताने ‘बुद्धिबळ ऑलिम्पियाड’चेही यशस्वी आयोजन केले होते. लवकरच तो दिवस येईल, जेव्हा बुद्धिबळात भारत एक आघाडीचे राष्ट्र म्हणून गणले जाईल,’’ असे कार्लसन म्हणाला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India on the verge of becoming the best in chess magnus carlsen amy
First published on: 01-06-2023 at 04:14 IST