टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पदकांच्या संख्येचा विक्रम यंदा भारत मोडणार का? याकडेच सर्व क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे. टोक्यो ऑलिम्पिकच्या १८ स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू सहभागी झाले होते. भारताकडून यावेळी १२६ स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेतला होता. दुसरीकडे भारतानं ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत वैयक्तिक ६ रौप्य पदकं पटकावली आहेत. वेटलिफ्टर मीराबाई चानू, कुस्तीपटू रवीकुमार दहिया, नेमबाज राज्यवर्धन राठोर, नेमबाज विजय कुमार, कुस्तीपटू सुशील कुमार आणि बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू यांचा यात समावेश आहे.

भारताची स्टार महिला वेटलिफ्टर मीराबाई चानूने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. मीराबाईने ४९ किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकले आहे. भारतीय वेटलिफ्टिंगच्या इतिहासातील ऑलिम्पिकमधील हे भारताचे दुसरे पदक आहे. ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणारी मीराबाई चानू ही पहिली भारतीय वेटलिफ्टर आहे. पुरुषांच्या फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये ५७ किलो वजनी गटात रवीकुमार दहियाचा अंतिम सामना रशियन ऑलिंपिक कमिटीच्या जावूर युगुयेवशी झाला, पण युगुयेवने आपला अनुभव पणाला लावत ही लढत ७-४ने जिंकली. रवीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले असून भारताच्या खात्यात अजून एका पदकाची नोंद झाली आहे.

Glenn Maxwell makes bizarre comment on Virat Kohli
T20 World Cup : ‘मला आशा आहे की विराट कोहलीची निवड होणार नाही’, आरसीबीच्या ‘या’ खेळाडूचे चकित करणारे वक्तव्य
Cash prize from Paris Olympics to gold medal winning athletes
सुवर्णपदकविजेत्या अ‍ॅथलेटिक्सपटूंना पॅरिस ऑलिम्पिकपासून रोख पारितोषिक! जागतिक अ‍ॅथलेटिक्स संघटनेचा निर्णय
pv sindhu
सिंधूची उबर चषक बॅडमिंटन स्पर्धेतून माघार; थॉमस चषकासाठी भारताचा मजबूत संघ
rohan bopanna and matthew ebden win miami open men s doubles title
मियामी खुली टेनिस स्पर्धा : बोपण्णा-एब्डेन जोडीला विजेतेपद

Olympic: कांस्यपदक विजेत्या हॉकी संघाला पंतप्रधान मोदींनी केला फोन, म्हणाले…

२००४ अँथेस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा नेमबाज राज्यवर्धन सिंह राठोर याने मेन्स डबल ट्रॅप शूटींगमध्ये रजत पदक पटकावलं होतं. नेमबाजीतील हे भारताचं पहिलं पदक होतं. त्यानंतर झालेल्या २०१२ च्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने सर्वात चांगली कामगिरी केली. या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने एकूण ६ पदकं जिंकली होती. त्यात दोन रौप्य पदकांचा समावेश होता. विजय कुमारनं पुरुष गटातील जलद पिस्टल फायरिंग स्पर्धेत रौप्य पदक मिळवलं होतं. सुशील कुमारने फ्रिस्टाइल ६६ किलो वजनी गटात रौप्य पदकावर मोहोर उमटवली होती.

१४ वर्षांच्या मुलीनं टोक्यो ऑलिम्पिकमध्ये जिंकलं गोल्ड मेडल; केला Perfect 10 चा अनोखा विक्रम

२०१६ च्या रियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची कामगिरी निराशाजनक राहिली. भारताच्या पदरी फक्त दोन मेडलची भर पडली. महिला फ्रिस्टाइल ५८ किलो वजनी गटात साक्षी मलिकने कांस्य पदक मिळवलं. तर पीव्ही सिंधुने महिला एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत रौप्य पदक पटकावलं होतं.