scorecardresearch

Premium

Ind vs WI : रहाणे-कोहलीच्या अर्धशतकी खेळीमुळे भारताकडे भक्कम आघाडी

तिसऱ्या दिवसाअखेरीस भारत २६० धावांनी पुढे

Ind vs WI : रहाणे-कोहलीच्या अर्धशतकी खेळीमुळे भारताकडे भक्कम आघाडी

वेस्ट इंडिजविरुद्ध अँटीग्वा येथे सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यावर भारतीय संघाने मजबूत पकड बसवली आहे. तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस भारताने ३ गडी गमावत १८५ धावांपर्यंत मजल मारली आहे. सध्याच्या घडीला भारताकडे २६० धावांची भक्कम आघाडी आहे. त्यामुळे आजच्या खेळात भारतीय फलंदाज किती धावांची भर घालतात हे पहावं लागणार आहे. कर्णधार विराट कोहली आणि उप-कर्णधार अजिंक्य रहाणे यांनी अर्धशतकी खेळी करत भारताचं पारड वर ठेवलं आहे.

वेस्ट इंडिजचा पहिला डाव २२२ धावांवर गारद करण्यात भारतीय गोलंदाजांना यश आलं. इशांत शर्माने वेस्ट इंडिजचा निम्मा संघ गारद केला. त्याला मोहम्मद शमी आणि रविंद्र जाडेजाने प्रत्येकी २-२ तर जसप्रीत बुमराहने १ बळी घेत चांगली साथ दिली. वेस्ट इंडिजकडून पहिल्या डावात मधल्या फळीमध्ये रोस्टन चेस आणि अखेरच्या फळीत शेमरॉन हेटमायर आणि कर्णधार जेसन होल्डर यांनी भारतीय गोलंदाजांना चांगली झुंज दिली, मात्र त्यांचे प्रयत्न तोकडेच पडले. पहिल्या डावात भारताने विंडीजवर ७५ धावांची महत्वपूर्ण आघाडी घेतली.

thackeray group organizes hou de charcha event in kalyan dombivali
कल्याण-डोंबिवलीत ‘होऊ द्या चर्चां’च्या चौक सभा; शिवसेना ‘उबाठा’तर्फे आयोजन
Rishi Sunak and Akshata Murthy
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांचा G20 मधून परतताच मोठा निर्णय, ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का
The employee boarded the truck to collect the toll from the truck driver
ट्रक चालकाकडून टोलचे पैसे घेण्यासाठी कर्मचारी चढला चालत्या ट्रकवर; Video पाहून हसू आवरणार नाही…
aditya thackeray letter to bmc commissioner demand to disposed accumulated waste in city
मुंबईत साचलेल्या कचऱ्याच्या ढिगांची विल्हेवाट लावावी; आदित्य ठाकरे यांचे मुंबई महानगरपालिका आयुक्तांना पत्र

पहिल्या डावाच्या तुलनेत भारतीय फलंदाजांनी दुसऱ्या डावात आश्वासक खेळ केला. तरीही सलामीवीर मयांक अग्रवालला झटपट माघारी धाडण्यात विंडीज यशस्वी ठरलं. फिरकीपटू रोस्टन चेसने त्याला पायचीत करत माघारी धाडलं. यानंतर लोकेश राहुल आणि चेतेश्वर पुजारा यांनी भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र ठराविक अंतराने ते ही माघारी परतले. यानंतर कर्णधार विराट कोहली आणि उप-कर्णधार अजिंक्य रहाणेने भारताचा डाव सावरला. दोन्ही फलंदाजांनी मोठे फटके खेळण्याचा मोह टाळत खेळपट्टीवर स्थिरावण्याकडे भर दिला. ज्याचा फायदा भारतीय संघाला झालेला पहायला मिळाला. दिवसाचा खेळ संपला तेव्हा विराट कोहली नाबाद ५१ तर अजिंक्य रहाणे नाबाद ५३ धावांवर खेळत होता. वेस्ट इंडिजकडून दुसऱ्या डावात आतापर्यंत रोस्टन चेसने २ तर केमार रोचने १ बळी घेतला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: India tour of west indies 2019 1st test antigua india in commendable position after virat ajinkya gutsy knock psd

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×