ऑस्ट्रेलियाने भारताचे २०९ धावांचे आव्हान १९.२ षटकातच पार करत तीन टी२० सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाने सामना ४ गडी राखून जिंकला. ऑस्ट्रेलियाकडून कॅमेरून ग्रीनने आक्रमक ६१ धावा केल्या तर पडझडीनंतर मॅथ्यू वेडने डाव सावरत २१ चेंडूत ४५ धावांची आक्रमक खेळी केली. भारताकडून अक्षर पटेलने ३ तर उमेश यादवने २ विकेट घेत चांगली झुंज दिली. याआधी केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव यांनी सुरूवातीच्या पडझडीनंतर तिसऱ्या विकेटसाठी ३१ चेंडूत नाबाद ५१धावांची अर्धशतकी भागीदारी रचत संघाला १० षटकात ८६ धावांपर्यंत पोहचवले. राहुल ४७ धावांवर नाबाद होता तर सूर्याने १६ चेंडूत २३ धावा केल्या होत्या. केएल राहुलने झळकावले अर्धशतक, सूर्यकुमार यादवच्या ४६ तसेच अखेरीस हार्दिक पंड्याच्या झंझावाती अर्धशतकामुळे भारतीय संघाने निर्धारित २० षटकात २०८ धावा उभारल्या.