बांगलादेश दौऱयातील एकमेव कसोटीच्या दुसऱया दिवसाचा खेळ पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला आहे. सकाळपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने दुसऱया दिवसाच्या खेळाची सुरूवातच होऊ शकली नाही. दुपारपर्यंत पावसाचा जोर कायम राहिल्याने अखेर पंचांनी आजच्या दिवसाचा खेळ रद्द करण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, पहिल्या दिवसाअखेर भारताच्या सलामीवीर जोडीने दमदार सुरूवात करून संघाच्या धावसंख्येची पायाभरणी केली आहे. सलामीवर शिखर धवनने पहिल्या दिवशी दीडशतकी खेळी साकरली तर मुरली विजय देखील शतकाच्या उंबरठ्यावर आहे. भारताची पहिल्या डावातील धावसंख्या बिनबाद २३९ अशी आहे.