भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी मालिकेतील पहिला सामना आजपासून सुरु होत आहे. भारतीय संघाचं नेतृत्व कर्णधार रोहीत शर्माच्या खांद्यावर आहे. विराट कोहलीनंतर आता रोहित शर्माकडे जबाबदारी सोपण्यात आली आहे. त्यामुळे रोहित शर्माचा नेतृत्वाचा कस लागणार आहे. कसोटी सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी नव्याने कर्णधारपदाची धुरा घेतलेल्या रोहित शर्मावर प्रश्नांचा भडीमार केला. या प्रश्नांना रोहित शर्माने आपल्या शैलीत उत्तरं दिली.

रोहित शर्माला एका पत्रकारानं प्रश्न विचारलं की, तुम्ही आतापर्यंत ४० हून अधिक सामने खेळला आहात? स्वत:साठी काही टार्गेट सेट केलं आहे का? यावर रोहित शर्माने आपल्या शैलीत उत्तर दिलं. “क्या सर..काय टार्गेट सेट करू मी माझ्यासाठी…माझं टार्गेट टीमसाठी सेट आहे. माझ्यासाठी मी तितका विचार केला नाही. ४० सामने खेळलो आहे, मी ४० सामने खेळून खूश आहे. याचं मला कोणतंच दु:ख वाटत नाही. खूप साऱ्या दुखापती आणि चढउतार पाहिले आहेत. सरळ मार्ग नाही मिळत. त्यातून आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतील.” त्यानंतर एका पत्रकाराने खेळपट्टी आणि प्रेक्षकांबाबबत प्रश्न विचारल्यानंतर रोहित शर्मा एकदम आनंदी झाला. “असे प्रश्न कोण विचारतच नाही. असे प्रश्न विचारले तर मी उत्तर देईन ना. हा खरा प्रश्न आहे. प्रेक्षक मैदानात आले तर आम्हालाही उत्साह येतो.”

Shubman Gill Future India Captain, Suresh Raina Claims
IPL 2024 : हार्दिक किंवा पंत नव्हे, तर ‘हा’ २४ वर्षीय खेळाडू असू शकतो भारताचा भावी कर्णधार, ‘मिस्टर आयपीएल’चे वक्तव्य
IPL 2024 Punjab Kings vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024: आयपीएलचे सर्व सीझन खेळलेल्या रोहित शर्माने रचला इतिहास, पंजाबविरूद्धचा सामना सुरू होताच हिटमॅनच्या नावे मोठी कामगिरी
Rr Vs Gt Ipl 2024 Sanju Samson 50th Match As Captain
RR vs GT : संजू सॅमसनने ५०व्या सामन्यात केला खास पराक्रम, ‘या’ बाबतीत रोहित शर्मासह तीन कर्णधारांना टाकले मागे
Despite the efforts of PR Sreejesh the Indian hockey team lost
श्रीजेशच्या प्रयत्नांनंतरही भारतीय हॉकी संघाचा पराभव

रोहित शर्मा आतापर्यंत ४३ कसोटी सामना खेळला असून ३,०४७ धावा केल्या आहेत. या सामन्यात रोहित शर्माने ८ शतकं आणि १४ अर्धशतकं झळकावली आहेत. २१२ ही त्याची सर्वोत्तम खेळी राहिली आहे. विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेतील पराभवानंतर कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली होती. यानंतर रोहित शर्माकडे जबाबदारी सोपण्यात आली होती