भारतीय क्रिकेट संघाचा तडाखेबंद फलंदाज म्हणून ओळखला जाणारा ऋषभ पंत हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. फलंदाजी करत असताना अनेकदा ऋषभ पंत जोखीम उचलत फटकेबाजी करत असतो. याचा फटकाही त्याला अनेकदा बसला आहे. दक्षिण आफ्रिकेविरोधातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात शून्यावर बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा ऋषभ पंतच्या फलंदाजीवरुन टीकेची झोड उठली आहे.

पंतने फेहलुकवालोच्या गोलंदाजीवर षटकार लगावण्याचा प्रयत्न केला असता झेलबाद झाला. ऋषभ पंत पुन्हा एकदा वाईट पद्धतीने बाद झाल्यामुळे चर्चा रंगली आहे.

Sanjay Raut Answer to Sanjay Shirsat
Shivsena : शिवसेनेचे दोन संजय, रेड्याची शिंगं, कुंभमेळा चेंगराचेंगरी आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
AnJali Damania on Dhananjay Munde
Anjali Damania : “दमानिया नव्हे बदनामिया”, धनंजय मुंडेंच्या टीकेवर अंजली दमानियांचं प्रत्युत्तर; म्हणाल्या, “खरंतर मला…”
Maharahstra Kesari
Maharahstra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा गोंधळ, पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?
Draupadi murmu and sonia gandhi
Rashtrapati Bhavan : “राष्ट्रपती थकलेल्या नाहीत”, सोनिया गांधींच्या टीकेनंतर राष्ट्रपती भवनातून प्रत्युत्तर!
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
Image Of Bajran Sonawane
Santosh Deshmukh Murder : संतोष देशमुख यांच्या हत्येला ५० दिवस पूर्ण, बजरंग सोनावणे म्हणाले, “आरोपींना पैसे पुरवणारे…”
Santosh Deshmukh Brother Dhananjay Deshmukh
Dhananjay Deshmukh : धनंजय देशमुख यांचा मोठा खुलासा, “त्यादिवशी आरोपी आणि एपीआयचं चहाचं बिल मीच दिलं, त्यानंतर त्याने…”

शिखर धवन ६१ धावांवर बाद झाल्यानंतर पंत मैदानात आला होता. पहिल्याच चेंडूवर पंतने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. याचा परिणाम त्याला शून्य धावांवर परतावं लागलं. यानंतर विराट कोहलीही ६५ धावांवर बाद झाला. चहरने ३३ चेडूंमध्ये ५४ धावा केल्या. चहरच्या खेळीमुळे भारतीय संघ २८८ धावांचा पाळलाग पूर्ण कऱण्याच्या जवळ आला होता. पण यानंतर पाच धावात तीन गडी बाद झाले आणि भारताने चार चेंडू शिल्लक असतानाही चार धावांनी हा सामना गमावला.

भारत-आफ्रिका एकदिवसीय मालिका : भारताची पाटी कोरी!; निसटत्या विजयासह आफ्रिकेचे एकदिवसीय मालिकेत वर्चस्व; चहरची झुंज अपयशी

भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीरने पंतच्या खेळीचं विश्लेषण केलं असून तो अशाच पद्धतीने खेळत राहील असं सांगितलं आहे. यावेळी त्याने जोखीम तसंच गेल्या एकदिवसीय सामन्यात केलेल्या ६५ धावांचाही उल्लेख केला.

“तो जसा आहे तसं त्याला स्वीकारलं पाहिजे. तो सामने जिंकून देणारे खेळी करु शकतो, पण याचवेळी तो आज खेळला तसे बेधडक फटकेही खेळणार. जर व्यवस्थापनाकडे अशा खेळाडूंना पाठिंबा देण्याचा संयम असेल तर भविष्यात त्याला अजून संधी मिळताना पाहू शकतो,” असं गौतम गंभीरने स्टार स्पोर्ट्सवर सामना संपल्यानंतर बोलताना म्हटलं आहे.

“तुम्ही जे पेरता, तेच उगवतं. पंत आज ज्या पद्धतीने खेळत आहे तसाच खेळत राहणार. तो विराट कोहलीसारखा नाही, जो हळूहळू आपली खेळी उभारत जाईल. संघ व्यवस्थापन त्याच्यात बदल करु शकतं, पण हो हे एका रात्रीत होणार नाही, यासाठी वेळ लागले,” असंही गंभीरने सांगितलं.

दरम्यान सामन्यासंबंधी बोलताना गंभीरने सांगितलं की, “जर कोहलीसारख्या एखाद्याने सामना संपवला असता तर त्यात नवीन काही नव्हतं. पण श्रेयस, सूर्यकुमार यांच्यापैकी कोणीतरी सामना संपवल्याचं पहायला मिळणं अपेक्षित आहेत. जर यांच्यापैकी एकाने सामना जिंकून दिला असता तर मधल्या फळीतील फलंदाज स्पर्धेत विजयी ठरला असता”.

Story img Loader