भारताचा तारांकित भालाफेकपटू नीरज चोप्राला जागतिक अजिंक्यपद स्पर्धेदरम्यान दुखापत झाली आहे. त्यामुळे तो बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या आगामी राष्ट्रकुल स्पर्धेतून बाहेर पडला आहे. दुखापत झाल्याने तो या स्पर्धेत खेळू शकणार नसल्याची माहिती भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (IOA) एक निवेदन जारी करत दिली आहे.

रविवारी ओरेगॉन येथे पार पडलेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत नीरजने ८८.१३ मीटर अंतरावर भालाफेक करून रौप्य पदक जिंकलं होतं. या स्पर्धेतील कामगिरीदरम्यान त्याला दुखापत झाल्याने तो राष्ट्रकुल स्पर्धेत खेळू शकणार नाही.

Sanju Samson should be groomed as next T20 captain for India after Rohit says Harbhajan Singh
Team India : रोहितनंतर भारताचा टी-२० कर्णधार कोण होणार? हार्दिक-पंतकडे दुर्लक्ष करत हरभजनने सांगितले ‘हे’ नाव
Stuart Broad Believes Rishabh Pant Should be Indias wicketkeeper batsman in world cup squad
IPL 2024: “त्याचा शॉट पाहून मला वाटलं तो T20 WC संघात असेल”, स्टुअर्ट ब्रॉड ‘या’ भारतीय खेळाडूमुळे झाला प्रभावित!
pv sindhu
सिंधूची उबर चषक बॅडमिंटन स्पर्धेतून माघार; थॉमस चषकासाठी भारताचा मजबूत संघ
ben stoke
बेन स्टोक्सची ट्वेन्टी-२० विश्वचषकातून माघार

याबाबत अधिक माहिती देताना आयओएचे महासचिव राजीव मेहता यांनी सांगितलं की, “भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा यानं आज सकाळी मला अमेरिकेतून फोन केला होता. दुखापत झाल्याने आपण बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत खेळू शकणार नाही, अशी माहिती त्यानं दिली. रविवारी पार पडलेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सहभाग घेतल्यानंतर नीरज चोप्रा याचं सोमवारी एमआरआय स्कॅन करण्यात आलं. त्या आधारावर डॉक्टरांनी त्याला एक महिन्याच्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे.”

हेही वाचा- World Athletics Championship: ‘रुपेरी’ कामगिरी केल्यानंतर नीरज चोप्रानं दिली प्रतिक्रिया, म्हणाला “हवामान अनुकूल नसूनही…”

गेल्यावर्षी टोकियो येथे पार पडलेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत नीरजने ‘सुवर्ण’ कामगिरी केली होती. त्यानंतर रविवारी ओरेगॉन येथे पार पडलेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत नीरजने रौप्यपदक (सिल्वर मेडल) जिंकलं होतं. अंतिम फेरीत भालाफेक करताना चौथ्या प्रयत्नानंतर नीरजने मांडीत दुखापत जाणवत असल्याची तक्रार केली होती. सोमवारी एमआरआय केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला एक महिना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे राष्ट्रकुल स्पर्धा दोन दिवसांवर आली असताना नीरजला स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं आहे.