रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम संघ एकदिवसीय क्रिकेटमध्ये विजयाच्या रथावर स्वार आहे. टीम इंडियाने विश्वचषक वर्षाची सुरुवात श्रीलंकेचा वनडे मालिकेत ३-०च्या फरकाने धुव्वा उडवून केली. यानंतर आता न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून त्यांनी मालिका २-०अशा फरकाने जिंकली आहे. टीम इंडियाने शनिवारी दुसऱ्या वनडे सामन्यात न्यूझीलंडचा ८ गडी राखून पराभव केला. त्यामुळे न्यूझीलंडला क्रमवारीत नुकसान झाले.

भारताकडून झालेल्या पराभवानंतर आयसीसी पुरुष एकदिवसीय संघांच्या क्रमवारीत न्यूझीलंड दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे, ज्याने इंग्लंडला अव्वल स्थानावर ढकलले आहे. या सामन्यापूर्वी न्यूझीलंड ११५ रेटिंग गुणांसह अव्वल स्थानावर होता. इंग्लंड ११३ रेटिंग गुणांसह दुसऱ्या, ११२ रेटिंग गुणांसह ऑस्ट्रेलिया तिसऱ्या आणि १११ रेटिंग गुणांसह भारत चौथ्या स्थानावर आहे. भारताकडून पराभूत झाल्यानंतर न्यूझीलंड ११३ रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचबरोबर भारत चौथ्या क्रमांकावर आला आहे.

Abhishek Sharma Breaks Chris Gayle and Sunil Narine's Record in SRH vs CSK Match
SRH vs CSK : अभिषेकने वादळी खेळीच्या जोरावर मोडला गेल-नरेनचा विक्रम, IPL मध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
India Vs Pakistan bilateral series
IND vs PAK : भारत आणि पाकिस्तान यांच्यात मालिका होणार? क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आयोजनासाठी व्यक्त केली इच्छा
IPL 2024 CSK vs RCB Match Updates in Marathi
CSK vs RCB : विराट कोहली चेन्नईविरुद्ध रचणार इतिहास, पहिली धाव घेताच करणार खास विक्रमाची नोंद
India Australia first Test match likely to be held in Perth sport news
भारत- ऑस्ट्रेलिया पहिली कसोटी पर्थला?

या मालिकेत टीम इंडियाने न्यूझीलंडला ३-० ने पराभूत केले, तर आयसीसी वनडे क्रमवारीत नंबर वन होण्याची सुवर्णसंधी असेल. टीम इंडियाने या मालिकेत क्लीन स्वीप केल्यास त्यांचे ११४ गुण होतील. तसेच न्यूझीलंडचा संघ १११ गुणांवर घसरेल. अशा परिस्थितीत या मालिकेनंतर टीम इंडियाला वनडेमध्ये नंबर वन होण्याची संधी आहे. सध्या या मालिकेत टीम इंडियाने २-० अशी आघाडी घेतली आहे.

हेही वाचा – IND vs NZ: पराभवानंतर टॉम लॅथमने ‘या’ दोन भारतीय गोलंदाजांना म्हटले निर्दयी; म्हणाला, ‘जेव्हा ते संघात असतात…’

या वर्षाच्या अखेरीस, वनडे विश्वचषक फक्त भारतात खेळवला जाणार आहे. टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध नुकत्याच झालेल्या वनडे मालिकेपासून तयारी सुरू केली आहे. या मोठ्या स्पर्धेच्या दृष्टीने न्यूझीलंडविरुद्ध होणारी मालिका भारतीय खेळाडूंसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. टीम इंडियाने २०११ मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली शेवटचा एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता, हा विश्वचषक देखील फक्त भारतातच खेळला गेला होता.