scorecardresearch

Premium

IPL 2021: मुंबई इंडियन्सने तीन खेळाडूंचा ड्रेसिंग रुममध्ये केला सन्मान; सचिन तेंडुलकरने इशानच्या…

आयपीएल २०२१ स्पर्धेतील प्लेऑफमध्ये चेन्नई, दिल्ली आणि बंगळुरू या तीन संघांनी स्थान मिळवलं आहे. तर चौथ्या स्थानासाठी मुंबई, कोलकाता, पंजाब आणि राजस्थान या चार संघात चुरस आहे.

Mumbai-Indians
IPL 2021: मुंबई इंडियन्सने तीन खेळाडूंचा ड्रेसिंग रुममध्ये केला सन्मान (Photo- Mumbai Indians Twitter)

आयपीएल २०२१ स्पर्धेतील प्लेऑफमध्ये चेन्नई, दिल्ली आणि बंगळुरू या तीन संघांनी स्थान मिळवलं आहे. तर चौथ्या स्थानासाठी मुंबई, कोलकाता, पंजाब आणि राजस्थान या चार संघात चुरस आहे. त्यामुळे या संघांची जर तरची लढाई सुरु आहे. मुंबई इंडियन्सने मंगळवारी राजस्थान रॉयल्सला ८ गडी राखून मात दिली आणि प्लेऑफमधील आशा कायम ठेवल्या आहे. या सामन्या नाथन कूल्टर नाइल, जीमी नीशम, जसप्रीत बुमरा आणि इशान किशनने चांगली कामगिरी केली. इशान किशनने २५ चेंडूत अर्धशतक झळकावलं. तसेच मुंबईला ७० चेंडू आणि ८ गडी राखून विजय मिळवून दिला.

मुंबईच्या विजयी कामगिरीनंतर संघ व्यवस्थापनाने इशान किशन सहित तीन खेळाडूंचा ड्रेसिंग रुममध्ये प्लेअर ऑफ द मॅच किताब देऊन सन्मान केला. भारताचा माजी क्रिकेटपटून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने इशानच्या जर्सीवर बॅज लावला. इशान व्यतिरिक्त वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा आणि जीमी नीशम यांचा प्लेअर ऑफ मॅच म्हणून गौरव करण्यात आला.

chandrashekhar bawankule
सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर राजकीय हालचालींना वेग, भाजपाकडून ‘प्लॅन बी’ तयार? बावनकुळे म्हणाले…
canada allegations on india
India-Canada Conflict: कॅनडाचे भारतावर आरोप, अमेरिका व ऑस्ट्रेलियाचा कॅनडाला पाठिंबा; जागतिक स्तरावर भारतविरोधी भूमिका!
abhidnya bhave shared swami samarth experience
नवऱ्याच्या आजारपणात अभिज्ञा भावेला ‘अशी’ आली स्वामींची प्रचिती; अनुभव सांगत म्हणाली, “तेव्हा माझ्या डोळ्यात…”
canada prime minister justin trudeau (1)
कॅनडाच्या पंतप्रधानांचं जी २० परिषदेवेळीच बिनसलं होतं? ‘या’ कृतीमुळे झाली होती भारतीय सुरक्षा यंत्रणेची अडचण!

“हा एक चांगला सामना होता. आमच्या संघासाठी हा विजय महत्त्वाचा होता. या सामन्यातील चांगल्या कामगिरीमुळे आत्मविश्वास दुणावला आहे. त्यामुळे पुढच्या सामन्यात याचा नक्कीच फायदा होईल”, असं इशान किशनने सांगितलं. तर बुमरानेही मिळालेल्या सन्मानाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. “या विजयामुळे मी खूश आहे. एका वेळी एक सामना पुढे घेत जाऊया. आपण काय नियंत्रित करू शकतो यावर लक्ष केंद्रित करु शकतो आणि चांगल्यासाठी प्रयत्नशील राहतो’, असं जसप्रीत बुमराने सांगितलं.

मुंबई

  • मुंबईने त्यांच्या अंतिम सामन्यात हैदराबादला पराभूत केलं तर स्पर्धेत टिकून राहण्यासाठी केकेआरला शेवटचा सामना जिंकावाच लागेल.
  • मुंबई सध्या पाचव्या स्थानी आहे. मात्र नेट रनरेटच्या बाबतीत ते केकेआरपेक्षा फारच मागे आहेत. दोन्ही संघांमधील नेट रनरेटचं अंतर फारच जास्त असल्याने त्यांना केकेआरच्या पराभवासाठी प्रार्थना करावी लागणार आहे.
  • एका अंदाजानुसार सध्या केकेआर आणि मुंबईमधील नेट रनरेटचं अंतर भरुन काढण्यासाठी मुंबईला हैदराबादविरुद्धचा सामना ११ षटकं शिल्लक असतानाच किंवा ९० हून अधिक धावांच्या फरकाने जिंकावा लागणार आहे.
  • अर्थात स्वत:चा शेवटचा सामना जास्तीत जास्त मोठ्या फरकाने जिंकण्यासोबतच त्यांना राजस्थान केकेआरला पराभूत करेल यासाठी देव पाण्यात ठेवावे लागणार आहेत. असं झालं तरच मुंबईला प्लेऑफमध्ये खेळता येईल.
  • मात्र केकेआरने त्यांचा अंतिम सामना जिंकला तर मुंबई आणि केकेआरचे गुण समान होतील पण नेट रनरेटच्या जोरावर केकेआर प्लेऑफमध्ये जाईल.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-10-2021 at 17:04 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×