मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) मंगळवारी झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जवर सहा गडी आणि सहा चेंडू राखून विजय मिळवला. किरॉन पोलार्डची अष्टपैलू चमक (नाबाद १५ धावा आणि २ बळी) आणि हार्दिक पंडय़ा (नाबाद ४०), सौरभ तिवारी (४५) यांच्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे मुंबईला हा विजय मिळवता आला. या विजयासहीत पाच वेळा स्पर्धा जिंकणाऱ्या मुंबईच्या संघाने प्लेऑफमध्ये जाण्याच्या आशा कायम ठेवल्या आहेत. मात्र केवळ या विजयावर मुंबईला समाधान मानता येणार नाही. आता मुंबईचे तीन सामने शिल्लक असून उर्वरित तिन्ही सामने जिंकल्यानंतर त्यांचा प्लेऑफमधील प्रवेश निश्चित मानला जात आहे. मात्र मुंबईची इतर तीन संघाशी चौथ्या जागेसाठी चुरशीची लढत होण्याचं चित्र सध्याच्या पॉइण्ट्स टेबलवरुन दिसत आहे. जाणून घेऊयात मंगळवारच्या सामन्यानंतरची परिस्थिती काय आहे.

चेन्नईची जागा फिक्स
मंगळवारच्या सामन्यानंतर चेन्नई गुणतालिकेमध्ये अव्वल स्थानी आहे. रविवारी कोलकात्यावर मिळावलेल्या विजयामुळे धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सचं प्लेऑफमधील स्थान जवळजवळ निश्चित झालंय. २०२० च्या पर्वात वाईट कामगिरी करणारा चेन्नईचा संघ यंदा मात्र प्लेऑफमध्ये पोहचणारा पहिला संघ मानला जातोय. चेन्नईचा प्लेऑफमधील प्रवेश जवळजवळ निश्चित झाला असून ८ विजय मिळवून १६ गुणांसहीत चेन्नई अव्वल स्थानी आहे. आता चेन्नई उर्वरित सर्व सामन्यांमध्ये पराभूत झाला तरी चौथ्या स्थानावर राहणार संघ ठरणार आहे. त्यामुळे त्याचं प्लेऑफचं तिकीट निश्चित झालं आहे.

नक्की वाचा >> ‘या’ वरिष्ठ खेळाडूने तक्रार केल्याने गेलं कर्णधारपद? BCCI कडे विराटच्या Attitude बद्दल केलेली तक्रार

दिल्ली आणि आरसीबीही जवळजवळ निश्चित
दिल्ली कॅपिटल्सच्या संघानेही प्ले ऑफचं तिकीट बूक केल्यात जमा आहे. १० पैकी ८ सामने जिंकलेल्या दिल्लीने १६ गुणांसहीत सध्या दुसऱ्या स्थानी मजल मारलीय. दिल्लीचा प्रवेश निश्चित समजला जातोय. याचबरोबर विराट कोहलीच्या संघाने उरलेल्या चारपैकी दोन सामन्यांमध्ये विजय मिळवला तरी त्यांना प्लेऑफमध्ये खेळण्याची संधी मिळणार असं मानलं जात आहे. खरी चुरस ही चौथ्या जागेसाठी असून कोलकाता नाईट रायडर्स, मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये या चौथ्या जागेसाठी काँटे की टक्कर होण्याची शक्यता आहे.

या चार संघांमध्ये चुरस
वर वर सांगायचं तर १६ गुण असणाऱ्या संघाला प्लेऑफमध्ये निश्चित मानलं जातं. सध्या कोलकात्याला आपले उर्वरित सर्व म्हणजे तिन्ही सामने जिंकावे लागणार आहेत. मुंबईलाही आपले तिन्ही सामने जिंकावे लागणार आहेत. पंजाब किंग्स आणि राजस्थानला प्लेऑफ्ससाठी सामने जिंकण्याबरोबरच दुसऱ्या संघांच्या वाईट कामगिरीवर निर्भर रहावं लागणार आहे. तसेच सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहेत. तरच नेट रनरेटच्या जोरावर त्यांना अंतिम चारमध्ये प्रवेश मिळण्याची शक्यता आहे.

नक्की वाचा >> ‘या’ वरिष्ठ खेळाडूने तक्रार केल्याने गेलं कर्णधारपद? BCCI कडे विराटच्या Attitude बद्दल केलेली तक्रार

सर्वात सोपा मार्ग…
अगदी आदर्श स्थितीमध्ये मुंबईला त्यांचे उर्वरित सर्व सामने जिंकावे लागणार आहे. प्लेऑफमध्ये पोहचायचं असेल आणि इतर संघांवर निर्भर रहायचं नसेल तर रोहितच्या संघासमोर ४ पैकी ४ विजय हा सर्वात सोपा मार्ग आहे. शेवटचे चारही सामने जिंकले तर त्यांचे एकूण गुण १६ होतील. म्हणजेच त्यांना या साखळी फेरीतील सामने संपताना चौथं स्थान मिळवता येईल. मुंबईचा संघ दिल्ली, पंजाब, राजस्थान आणि हैदराबादविरोधात आपले उर्वरित सामने खेळणार आहे. हे चारही संघ सुद्धा फरसे फॉर्मात नसल्याने मुंबईला अजूनही प्लेऑफमध्ये पोहचण्याची संधी आहे.

मुंबईसाठी सर्वात सोपा मार्ग…
अगदी आदर्श स्थितीमध्ये मुंबईला त्यांचे उर्वरित सर्व सामने जिंकावे लागणार आहे. प्लेऑफमध्ये पोहचायचं असेल आणि इतर संघांवर निर्भर रहायचं नसेल तर रोहितच्या संघासमोर ३ पैकी ३ विजय हा सर्वात सोपा मार्ग आहे. शेवटचे तिन्ही सामने जिंकले तर त्यांचे एकूण गुण १६ होतील. म्हणजेच त्यांना या साखळी फेरीतील सामने संपताना चौथं स्थान मिळवता येईल. मुंबईचा संघ दिल्ली, राजस्थान आणि हैदराबादविरोधात आपले उर्वरित सामने खेळणार आहे. हे तिन्ही संघ सुद्धा फरसे फॉर्मात नसल्याने मुंबईला विजयी सातत्य कायम ठेवत प्लेऑफमध्ये पोहचण्याची संधी आहे.

नक्की वाचा >> IPL 2021: “मी असतो तर कर्णधारपद सोडलं असतं”; ‘त्या’ कृतीमुळे संतापला गौतम गंभीर

चार विजय मिळवता आले नाही तर?
आपल्या उरलेल्या तीनपैकी दोन सामन्यांमध्ये विजय मिळवल्यानंतरही मुंबई प्लेऑफमध्ये खेळण्याची शक्यता आहे. मात्र असं झाल्यास मुंबईला १४ गुणांसहीत इतर संघाच्या कामगिरीवर अवलंबून रहावं लागणार आहे. सध्या राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्सचे संघ मुंबईच्या पुढे आहे. प्लेऑफसाठी सध्या ज्या चार संघांमध्ये चुरस आहे त्यामध्ये सर्वात वाईट नेट रनरेट मुंबईचा आहे. म्हणजेच २०१४ च्या सिझनप्रमाणे ज्यापद्धतीने मुंबईला रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात जिंकण्यासाठी शेवटच्या चेंडूवर षटकार हवा होता तशी परिस्थितीही निर्माण होऊ शकते. त्यामुळेच सरळ सर्व उर्वरित सामने जिंकणे हा अधिक सुटसुटीत पर्याय मुंबईला कधीही हवाहवासा वाटणार आहे यात शंका नाही.

आज विराटचा संघ उतरणार मैदानात
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुला सलग दुसऱ्या हंगामात बाद फेरी गाठण्याची नामी संधी आहे. त्यामुळे गतविजेत्या मुंबई इंडियन्सला धूळ चारल्यावर आता बुधवारी राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणाऱ्या ‘आयपीएल’ लढतीत विजयी सातत्य टिकवण्याचे बेंगळूरुचे लक्ष्य असेल.  बेंगळूरुच्या खात्यात १० सामन्यांत १२ गुण आहेत. कोहलीन गेल्या दोन सामन्यांत अर्धशतके झळकावून अन्य संघांना इशारा दिला आहे. ‘पर्पल कॅप’च्या शर्यतीत अग्रस्थानी असलेला हर्षल पटेल त्यांच्यासाठी मोलाची भूमिका बजावत आहे. दुसरीकडे राजस्थानला मागील दोन सामन्यांत अनुक्रमे दिल्ली आणि हैदराबादने पराभूत केले. त्यामुळे १० सामन्यांतून आठ गुण नावावर असलेल्या राजस्थानने येथून पुढे प्रत्येक लढत जिंकणे अनिवार्य आहे.