टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली एक उत्तम क्षेत्ररक्षक असल्याचे सर्वांनाच माहीत आहे. आज त्याने चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात पुन्हा सिद्ध केले. शारजाहच्या मैदानावर रंगलेल्या सामन्यात विराटच्या संघाला पराभवाला सामोरे जावे लागले, पण त्याने घेतलेला ऋतुराज गायकवाडचा झेल सर्वांच्या लक्षात राहिला.

बंगळुरूच्या १५७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईचे सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि फाफ डु प्लेसिस यांनी उत्तम सुरुवात केली. त्यांनी ७१ धावांची सलामी दिली. नवव्या षटकात विराटने फिरकीपटू यजुर्वेंद्र चहलकडे चेंडू सोपवला. चहलने ऋतुराजला विराटकरवी झेलबाद केले. विराटने सूर मारत हा झेल उत्तमरित्या टिपला. विराटने क्षेत्ररक्षणाशिवाय फलंदाजीतही दमदार कामगिरी केली. विराटने ६ चौकार आणि एका षटकारासह ५३ धावांची खेळी केली.

salman khan firing accused Sagar pal father reaction
सलमान खानच्या घरावर गोळ्या झाडणाऱ्या आरोपीच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “तो खूप…”
Crew actor Trupti Khamkar says was not given any lines
१२ तासांचं काम अर्ध्या तासात…, मराठमोळ्या तृप्ती खामकरने सांगितला ‘क्रू’च्या सेटवरचा अनुभव; म्हणाली, “बाजूला उभे राहून…”
Mayank Yadav Reveals About Fitness
IPL 2024 : सर्वात वेगवान चेंडू टाकणाऱ्या मयंक यादवच्या फिटनेसचं रहस्य काय? त्यानंच सांगितलं तो काय करतो?
Salman Khan was the bartender at Riddhima Kapoor wedding
रणबीर कपूरच्या बहिणीच्या लग्नात बारटेंडर होता सलमान खान; ऋषी कपूर त्याला म्हणाले होते, “तू निघ तिथून…”

आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यात महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज संघाने सलग दुसरा विजय नोंदवला आहे. शारजाहच्या मैदानावर रंगलेल्या सामन्यात चेन्नईने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला ६ गड्यांनी मात दिली. नाणेफेक जिंकलेल्या धोनीने विराटसेनेला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. दमदार सुरुवात केलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने शेवटच्या पाच षटकात विकेट्स गमावत चेन्नई सुपर किंग्जला विजयासाठी १५७ धावांचे आव्हान दिले आहे. वाळूच्या वादळामुळे नाणेफेकीला उशीर झाला. नाणेफेकीलाचा कौल धोनीच्या बाजूने लागला आणि त्यांनी प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या छोट्या मैदानावर प्रेक्षकांना चौकार-षटकारांचा पाऊस पाहायला मिळेल, अशी शक्यता आधीपासूनच वर्तवण्यात येत होती.

हेही वाचा थरारनाट्यच..! विजय मिळाला म्हणून टीम इंडियाच्या खेळाडूंनी केला जल्लोष, इतक्यातच पंचांनी…

विराट-देवदत्तने अर्धशतकी खेळ्या करत १११ धावांची दमदार सलामीही दिली. पण हे दोघे माघारी परतल्यानंतर आरसीबीचे उर्वरित स्टार फलंदाज मोठे फटके खेळू शकले नाहीत. चेन्नईने शेवटच्या पाच षटकात त्यांना केवळ २५ धावा दिल्या. त्यामुळे उत्तम सुरुनवातीनंतरही त्यांनी चेन्नईसमोर १५७ धावांचे आव्हान ठेवता आले. प्रत्युत्तरात चेन्नईने अर्धशतकी सलामी आणि मधल्या फळीतील महत्त्वपूर्ण भागीदाऱ्यांमुळे बंगळरूच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला. बंगळुरूच्या धावसंख्येला लगाम घालणाऱ्या चेन्नईच्या ड्वेन ब्राव्होला सामनावीर पुरस्कार मिळाला.