नवीन आयपीएल फ्रेंचायझी लखनऊने भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरला संघाचा मार्गदर्शक (मेंटॉर) म्हणून नियुक्त केले आहे. आयपीएलमध्ये गंभीर पहिल्यांदाच एखाद्या संघात मार्गदर्शक म्हणून सामील होणार आहे. अलीकडेच लखनऊने झिम्बाब्वेचे माजी कर्णधार अँडी फ्लॉवर यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली. क्रिकबझशी बोलताना, लखनऊ संघाचे मालक संजीव गोयंका म्हणाले, ”होय, आम्ही गौतम गंभीरला संघात मार्गदर्शक म्हणून सामील केले आहे.”

गौतम गंभीरने त्याच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाला दोनदा चॅम्पियन बनवले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली केकेआरने २०१२ मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा ५ गडी राखून आणि २०१४ मध्ये पंजाब किंग्जचा ३ गडी राखून पराभव केला होता. केकेआर व्यतिरिक्त गंभीर दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधारही होता. आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून त्याने १२९ सामने खेळले आणि ७१ सामने जिंकले.

IPL 2024 Chennai Punjab Kings vs Sunrisers Hyderabad Match Updates in Marathi
IPL 2024: हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर सॅम करनने केली रिव्ह्यूची मागणी, करनच्या चतुराईमुळे असा बाद झाला राहुल त्रिपाठी; पाहा VIDEO
Rohit sharma speech in Mumbai Indians Dressing Room Video MI vs DC
IPL 2024: ‘वैयक्तिक कामगिरी, विक्रम फारसे महत्त्वाचे नाहीत…’, रोहित शर्माने मुंबईच्या विजयानंतर ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंशी साधला संवाद
Mohit Sharma on Ravi Shastri's Comment
GT vs SRH : वयांवरुन खिल्ली उडवणाऱ्या रवी शास्त्रींना मोहित शर्माचे चोख प्रत्युत्तर; म्हणाला, ‘माझं वय वाढतंय…’
Rohit Sharma takes over, sends Hardik Pandya to the boundary in iconic role-reversal as MI captain feels SRH's wrath
VIDEO : हैदराबादच्या ‘रन’ धुमाळीसमोर हार्दिकने पत्करली शरणागती, रोहितने मुंबईचे नेतृत्व करताना पाठवले सीमारेषेवर

हेही वाचा – IND vs SA : ठरलं बघा..! टीम इंडियाला मिळाला उपकप्तान; अजिंक्य रहाणे नव्हे, तर ‘हा’ खेळाडू सांभाळणार जबाबदारी!

लखनऊचा संघ आरपी-संजीव गोयंका ग्रुपने ७,०९० कोटी रुपयांना विकत घेतला आहे आणि ते पाच वर्षांनंतर लीगमध्ये परतत आहे. याआधी २०१६ आणि २०१७ या दोन वर्षांत गोयंका ग्रुपकडे रायझिंग पुणे सुपरजायंट्सचा संघ होता. तर, सीव्हीसी कॅपिटलने ५,१६६ कोटी रुपयांची बोली लावत अहमदाबाद संघ खरेदी केला आहे.

महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २००७ टी-२० विश्वचषक आणि २०११ एकदिवसीय विश्वचषक जिंकला. या विजयात गंभीरचा मोलाचा वाटा होता. २००७च्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात गंभीरने अप्रतिम फलंदाजी केली होती. पाकिस्तानविरुद्ध गौतमच्या बॅटमधून ७५ धावा आल्या. त्याच्या खेळीमुळेच भारतीय संघाला सामन्यात दमदार पुनरागमन करता आले.

२०११ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात सचिन आणि सेहवाग लवकर बाद झाल्यानंतर गंभीरने डावाची धुरा सांभाळली. त्याने श्रीलंकेविरुद्ध ९७ धावा केल्या आणि सामना भारताच्या बाजूने वळवला.