आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ५९ व्या लढतीत चेन्नई सुपर किंग्ज संघाची पुरती दुर्दशा झाली. चेन्नईने अवघ्या 97 धावांवर पूर्ण गडी गमावले आहेत. हा सामना म्हणजे करो या मरोची लढाई चेन्नईच्या फलंदाजांचा मुंबईच्या गोलंदाजांसमोर निभाव लागला नाही.

हेही वाचा >>> इंग्लंड पुरुष कसोटी संघाच्या प्रशिक्षकपदी ब्रेंडन मॅक्युलम यांची नियुक्ती

या सामन्यात कर्णधार महेंद्रसिंह धोनी वगळता चेन्नईच्या एकाही फलंदाजाने चांगली कामगिरी केली नाही. सलामीला आलेल्या ऋतुराज गायकवाड (७) आणि ड्वेन कॉन्वे (०) या जोडीने पुरती निराशा केली. तसेच दुसऱ्या विकेटसाठी आलेला मोईन अलीदेखील खातं खोलू शकला नाही. तर रॉबिन उथप्पादेखील फक्त एक धाव करुन पायचित झाला. ऋतुराज गायकवाड बाद होईपर्यंत चेन्नईच्या फक्त १७ धावा झाल्या.

हेही वाचा >>> ‘BCCI ला भाजपा सरकार चालवतंय, खेळायचं असेल तर पाकिस्तानात या’, पीसीबीच्या माजी अध्यक्षांचं मोठं विधान

त्यानंतर चौथ्या विकेटसाठी आलेल्या अंबाती रायडूने बचावात्मक पवित्रा घेत धावा करण्याचा प्रयत्न केला. मात्र अवघ्या दहा धावा झालेल्या असताना तोही झेलबाद झाला. वरच्या फळीतील सर्वच फलंदाज दहा पेक्षा जास्त धावा करु न शकल्यामुळे चेन्नई संघाची चांगलीच दुर्दशा झाली. शेवटच्या फळीतील फलंदाजही मुंबईच्या गोलंदाजांसमोर तग धरू शकले नाहीत. शिवम दुबे(१०), ड्वेन ब्राव्हो (१२), समरजित सिंह (२) माहिश तिक्षाणा (०) यांनी अतिशय खराब फलंदाजी केली.

हेही वाचा >>> शाहरुख खानच्या नाईट रायडर्स ग्रुपचा विस्तार, यूएई टी-२० लीगसाठी खरेदी केला संघ

पाचव्या विकेटसाठी आलेल्या महेंद्रसिंह धोनीने मोठे फटके मारण्याचे टाळत मैदानावर टिकून राहण्याचा प्रयत्न केला. त्याने संधी मिळताच चौकार देखील लगावले. त्याने ३३ चेंडूंमध्ये ३६धावा करत चेन्नईचा धावफलक फिरता ठेवण्याचा प्रयत्न केला. तर दहाव्या विकेटसाठी आलेल्या मुकेश चौधरीने धोनीला देण्याचा प्रयत्न केला. मात्र सोळाव्या षटकादरम्यान तो धावबाद झाला.