What will Be The Impact of Operation Sindoor on IPL 2025: जम्मू काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याचं चोख प्रत्युत्तर भारतीय सैन्याने दिलं आहे. भारत सरकार आणि भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील दहशतवादी आणि त्यांच्या ठिकाणांवर ऑपरेशन सिंदूरद्वारे एअर स्ट्राईक करण्यात आला आणि दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला गेला. या एअर स्ट्राईकमध्ये पाकिस्तानमधील ९ दहशतवादी ठिकण उद्ध्वस्त करण्यात आली, याची माहिती भारतीय सैन्याने स्वत: दिली. दरम्यान, धरमशाला येथील विमानतळ बंद करण्यात आले आहे. त्यानंतर आयपीएल सामन्यावरही प्रश्न उपस्थित झाले आहेत.

भारतात सध्या आयपीएल २०२५चे सामने खेळवले जात आहेत. स्पर्धा सध्या शेवटच्या टप्प्यात आली असून प्लेऑफची शर्यत अधिक चुरशीची झाली आहे. त्यामुळे आता आयपीएलमध्ये होणारा प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. दरम्यान भारतीय सैन्याने केलेल्या एअऱ स्ट्राईकनंतर धरमशालामधील सामना होणार का यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कारण पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना ८ मे रोजी धरमशाला येथे होणार आहे.

ऑपरेशन सिंदूरनंतर धरमशाला विमानतळ बंद झाल्यामुळे, मुंबई इंडियन्सना पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यासाठी धरमशाला येथे पोहोचण्यात अडचणी येऊ शकतात. मुंबईचा संघ प्रथम मुंबईहून दिल्लीला येऊ शकतो आणि नंतर दिल्लीहून रस्त्याने धरमशाला येथ पोहोण्याची शक्यता आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर सुरक्षेच्या कारणास्तव धरमशाला, चंदीगढ, लेह, जम्मू, श्रीनगर आणि अमृतसर येथील विमानतळ काही काळासाठी बंद करण्यात आली आहेत.

पंजाब आणि दिल्ली यांच्यातील सामना ८ एप्रिल रोजी धरमशाला येथे खेळवला जाईल. दिल्लीचा संघ धरमशालामध्ये पोहोचला आहे, परंतु त्यानंतर, दिल्ली कॅपिटल्सला ११ मे रोजी दिल्लीत होणाऱ्या गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यासाठी रस्त्याने प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे.

८ मे नंतर ११ मे रोजी पंजाब आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना होणार आहे. इंडिया टुडेने दिलेल्या माहितीनुसार, एका सूत्राने माहिती दिली की, बीसीसीआय परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाईल. सध्या आयपीएल निश्चित वेळापत्रकानुसार चालेल. पण मुंबई इंडियन्सकडून अद्याप या संदर्भात कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई संघ ८ मे रोजी धरमशालासाठी रवाना होईल.

पंजाब किंग्स, दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. पंजाब किंग्ज प्लेऑफच्या अगदी जवळ आहेत. तर दिल्लीला प्लेऑफसाठी पात्र ठरण्याकरता फार कष्ट घ्यावे लागणार आहेत. श्रेयस अय्यरचा पंजाब ११ सामन्यांनंतर १५ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. दिल्ली ११ सामन्यांनंतर १३ गुणांसह पाचव्या स्थानी आहे. तर मुंबईचा संघ १२ सामन्यांमध्ये १४ गुणांसह चौथ्या स्थानी आहे.