आयपीएल क्रिकेटचा पंधरावा हंगाम दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. येत्या २६ मार्चपासून आयपीएलच्या सामन्यांना सुरुवात होणार असून तब्बल दोन महिने ही स्पर्धा चालणार आहे. दरम्यान, खेळाडू तसेच इतर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा गंभीर मुद्दा आता समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार दहशतवाद विरोधी पथकाने काही दहशतवाद्यांना अटक केलं आहे. या दहशतवाद्यांनी आयपीएल सामने खेळवले जाणारी मैदाने, खेळाडू थांबलेले हॉटेल्स, तसेच मैदानापर्यंत जाण्याच्या मार्गाची रेकी केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दहशतवाद विरोधी पथक म्हणजेच एटीएसने काही दहशतवाद्यांना अटक केलं आहे. या दहशतवाद्यांची चौकशी केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांनी आयपीएलचे सामने ज्या ठिकाणी खेळवले जाणार आहेत, त्या मैदानांची पाहणी केली होती. तसेच त्यांनी खेळाडू ज्या ठिकाणी थांबलेले आहेत ते हॉटेल्स तसेच हॉटेल आणि मैदानापर्यंत जाण्याच्या मार्गाचीही रेकी केलेली आहे. त्यामुळे खेळाडूंच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला आहे. खबरदारी म्हणून स्पर्धेदरम्यान, सामना होणारे मैदान, खेळाडू ज्या ठिकाणी थांबलेले आहेत ते हॉटेल्स त्याचबरोबर मैदानापर्यंत जाण्याच्या मार्गावरील सुरक्षा कडक करण्यात येणार आहे. आयपीएलचे बहुतांश सामने मुंबईतील वानखेडे आणि ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहेत.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Special security arrangements is made for ipl 2022 amid terrorist recce prd
First published on: 24-03-2022 at 13:53 IST