भारतीय संघाने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली २००७ साली टी-२० विश्वचषक जिंकला होता. त्या विश्वचषकात फायनलचा हिरो जोगिंदर शर्मा ठरला होता. या जोगिंदर शर्माने आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. शुक्रवारी (३ फेब्रुवारी) ३९ वर्षीय जोगिंदर शर्मा यांनी ट्विटरवर निवृत्तीची घोषणा केली.

हरियाणातील रोहतक येथून आलेल्या जोगिंदर शर्माने भारतासाठी फक्त ४ वनडे आणि ४ टी-२० सामने खेळले आहेत. विशेष म्हणजे त्याने आपल्या कारकिर्दीतील सर्व टी-२० सामने केवळ विश्वचषकात खेळले आणि इतिहास रचला. २००४ मध्ये त्याने भारतासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि २००७ मध्ये शेवटचा एकदिवसीय सामना खेळला.

Rohit Sharma Unwanted Record In IPL 2024
MI vs CSK : रोहित शर्माच्या नावावर झाली नकोशा विक्रमाची नोंद, ‘या’ बाबतीत ठरला तिसरा खेळाडू
Despite the efforts of PR Sreejesh the Indian hockey team lost
श्रीजेशच्या प्रयत्नांनंतरही भारतीय हॉकी संघाचा पराभव
Ayesha Khan, Bigg Boss Fame, Cheers For MS Dhoni During
DC Vs CSK: ‘माही’ला चिअर करणारी ही अभिनेत्री चर्चेत, चेन्नईने सामना गमावला तरीही जिंकली मनं
babar azam became again captain of pakistan cricket team
बाबर पुन्हा पाकिस्तानचा कर्णधार

जोगिंदर शर्मा सध्या हरियाणा पोलिसमध्ये डीएसपी म्हणून कार्यरत आहे. काही काळापूर्वी तो हरियाणाकडून रणजी ट्रॉफीही खेळत होता.
जोगिंदर शर्माने ट्विटरवर त्यांचे पत्र शेअर केले आहे, जे त्यांनी बीसीसीआय सचिव जय शाह यांना पाठवले आहे. त्याचबरोबर निवृत्तीची घोषणा केली आहे. जोगिंदर शर्माने लिहिले, मी बीसीसीआय, हरियाणा क्रिकेट असोसिएशन, चेन्नई सुपर किंग्ज आणि हरियाणा सरकारचे आभार मानतो. जोगिंदर शर्माने त्याचे चाहते, कुटुंब, मित्रांचे आभार मानले, ज्यांनी त्याच्या कारकिर्दीतील चढ-उतारांवर त्याला साथ दिली. अशा पद्धतीने जोगिंदर शर्माने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

जोगिंदर शर्माचे ट्विट

जोगिंदर शर्माचे ते ऐतिहासिक षटक –

त्या फायनलच्या शेवटच्या षटकात पाकिस्तानला विजयासाठी १३ धावांची गरज होती. कर्णधार धोनीने अगदी नवशिक्या गोलंदाज जोगिंदर शर्माकडे चेंडू दिला. मिसबाह-उल-हक क्रीजवर असल्यामुळे भारतीय चाहत्यांनी श्वास रोखून धरला होता. सर्वत्र प्रश्न निर्माण होऊ लागले – जोगिंदरला गोलंदाजी का दिली गेली..?

आयसीसी ट्विट

शेवटचे षटक: जोगिंदर विरुद्ध मिसबाह –

अखेरच्या षटकात पाकिस्तानला विजयासाठी १३ धावांची गरज होती.
१. जोगिंदरने पहिला चेंडू वाईड टाकला.
वाइडऐवजी टाकलेला पुढचा चेंडू मिसबाह खेळताना चुकला. त्यामुळे एकही धाव मिळाली नाही.
२. यानंतर जोगिंदरने फुलटॉस फेकला, ज्यावर मिसबाहने षटकार मारून पाकिस्तानच्या आशा पुन्हा जागृत केल्या.
३. मिसबाहने स्कूप शॉट खेळला आणि चेंडू शॉर्ट फाईन-लेगच्या दिशेने गेला. जो श्रीसंतने झेलला आणि टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला. भारताने पहिला टी-२० विश्वचषक अवघ्या ५ धावांनी जिंकला.