scorecardresearch

Premium

आयपीएलच लक्ष्य -शुक्ला

‘सामन्यांसाठी अचानक नवी ठिकाणे ठरवणे अवघड’

 राजीव शुक्ला, आयपीएल प्रमुख
राजीव शुक्ला, आयपीएल प्रमुख

‘सामन्यांसाठी अचानक नवी ठिकाणे ठरवणे अवघड’
आयपीएलला अयोग्य पद्धतीने लक्ष्य केले आहे. आता ही लीग चालू असताना अचानक सामने स्थलांतरित करणे हे अतिशय कठीण आहे, परंतु भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) वैकल्पिक योजनेचा विचार करीत आहे, असे दुष्काळग्रस्त महाराष्ट्रातून आयपीएलचे १३ सामने रद्द केल्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर लीगचे प्रमुख राजीव शुक्ला यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ३० एप्रिलच्या पुढे होणारे राज्यातील सर्व सामने अन्यत्र हलवण्याची सूचना मुंबई उच्च न्यायालयाने बीसीसीआयला बुधवारी दिली. याबाबत शुक्ला म्हणाले, ‘‘सामने अन्यत्र हलवताना ते नेमके कुठे खेळवावे, हा प्रश्न अतिशय आव्हानात्मक आहे. नुकतेच ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे २४ सामने झाले, तेव्हा याविरोधात कुणीही आवाज उठवला नव्हता. साखर कारखाने आणि बांधकामेसुद्धा थांबवण्याची आवश्यकता आहे. गोल्फच्या क्रीडांगणासाठी मोठय़ा प्रमाणात पाणी लागते. त्यांना कुणीच विरोध केलेला नाही.’’
‘‘आयपीएलचे आयोजन करणे, हे कठीण कार्य असते. ते सोपे नाही. सर्व तयारी पूर्ण झाली आहे. आता सामने हलवल्यामुळे समस्या झाली आहे. अद्याप तरी निकालाची प्रत मी पाहिलेली नाही. मगच सामन्यांच्या ठिकाणांचे नियोजन करता येईल,’’ असे शुक्ला यांनी सांगितले.
‘‘गेल्या सहा महिन्यांत कोणीही हा प्रश्न उपस्थित केला नाही. ज्या गोष्टींची आवश्यकता होती, ते आम्ही केले होते. महाराष्ट्रात चालू असलेल्या अन्य खेळांना आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनासुद्धा पाणी लागते आणि त्यासाठी मदत केली जाते, या वास्तवाकडे लक्ष देण्याची गरज आहे,’’ असे शुक्ला यांनी सांगितले.
आयपीएलसंदर्भात नकारात्मकता पसरवण्याचा हा प्रयत्न झाला आहे, अशा शब्दांत बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी आपली नाराजी प्रकट केली. ‘‘आम्ही पिण्याचे पाणी वापरत नाही. तर प्रक्रिया केलेले सांडपाणी वापरतो. दुष्काळाच्या निमित्ताने पंचतारांकित हॉटेल्सचे किती जलतरण तलाव बंद झाले? लोक आपल्या बगिच्यात पाणी घालायचे थांबले का?,’’ असे सवाल ठाकूर यांनी उपस्थित केले.
‘‘गेल्या काही दिवसांत प्रत्येक विषयावर नकारात्मकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आयपीएलसाठी ०.०००३८ टक्के पाण्याचा वापर केला जातो. ही गरज अतिशय कमी आहे,’’ असे ते म्हणाले.
सामने महाराष्ट्रातून हलवण्यात यावे, अशी किंग्ज इलेव्हन पंजाबचे मालक नेस वाडिया यांनीसुद्धा भूमिका घेतली होती. राज्यातील दुष्काळबाधित जनतेच्या भावनांचा न्यायालयाने आदर केला आहे, अशा शब्दांत वाडिया यांनी या निर्णयावर समाधान प्रकट केले.

नुकतेच ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे २४ सामने झाले, तेव्हा याविरोधात कुणीही आवाज उठवला नव्हता. साखर कारखाने आणि बांधकामेसुद्धा थांबवण्याची आवश्यकता आहे. गोल्फच्या क्रीडांगणासाठी मोठय़ा प्रमाणात पाणी लागते. त्यांना कुणीच विरोध केलेला नाही.
– राजीव शुक्ला,
आयपीएल प्रमुख

India vs Australia Cricket Score Updates in Marathi
IND vs AUS: आश्विन ११ वर्षानंतर चेन्नईत वनडे खेळण्यासाठी सज्ज! आयसीसीने शेअर केला ऑस्ट्रेलियाला धडकी भरवणारा VIDEO
World Cup 2023 IND vs AUS Match Updates
World Cup 2023, IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याची संभाव्य प्लेइंग इलेव्हन, पिच रिपोर्ट आणि मॅच प्रिडीक्शनसह, जाणून घ्या सर्व काही
Suryakumar Yadav's luck will change in one innings Shreyas Iyer's position from World Cup playing XI in danger zone
IND vs AUS: ‘मिस्टर ३६०’ फॉर्ममध्ये परतला, एकदिवसीय क्रिकेटमध्ये सूर्यकुमारने झळकावले तिसरे अर्धशतक; श्रेयस अय्यरचे स्थान धोक्यात
IND vs AUS 1st ODI Updates
IND vs AUS 1st ODI: ऑस्ट्रेलियाविरुद्ध शुबमन गिलने मोडला बाबर आझमचा विक्रम, घरच्या मैदानावर केला खास पराक्रम

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Last minute venue shift difficult says ipl chief rajeev shukla

First published on: 14-04-2016 at 05:39 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×