अशोक मनेरिया याने शानदार शतक झळकावत राजस्थानला महाराष्ट्राविरुद्धचा रणजी क्रिकेट सामना अनिर्णीत ठेवण्यात यश मिळवून दिले. महाराष्ट्राने पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर तीन गुण वसूल केले.
मनेरियाने नाबाद दीडशतकी खेळीसह रजत भाटिया व दिशांत याज्ञिक यांच्या समवेत शतकी भागीदारी रचताना महाराष्ट्राला निर्णायक विजयापासून दूर ठेवले. त्यामुळेच राजस्थानला दुसऱ्या डावात ५ बाद ३३४ अशी धावसंख्या रचता आली. शेवटच्या सत्रात २४३ धावांचे आव्हान मिळालेल्या महाराष्ट्राने दुसऱ्या डावात बिनबाद १९ धावा केल्या. मनेरिया याने १२ चौकार व दोन षटकारांसह नाबाद १५० धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक-राजस्थान पहिला डाव ३१८ व ५ बाद ३३४ घोषित (अशोक मनेरिया नाबाद १५०, रजत भाटिया ६४, दिशांत याज्ञिक नाबाद ५८, श्रीकांत मुंडे २/५१)
महाराष्ट्र ४०९ व बिनबाद १९
संग्रहित लेख, दिनांक 26th Oct 2015 रोजी प्रकाशित
महाराष्ट्राची तीन गुणांची कमाई
महाराष्ट्राने पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर तीन गुण वसूल केले.
Written by झियाऊद्दीन सय्यदझियाउद्दीन सय्यद
Updated:
First published on: 26-10-2015 at 00:01 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra earn three point against rajasthan in ranji trophy