पावसाच्या व्यत्ययामुळे चार दिवस खेळ झाला नाही. साहजिकच या सामन्यातून आम्हाला काहीही सकारात्मक निष्पन्न झालेले नाही. आमची पाटी कोरीच राहिली, असे दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार हशिम अमलाने सांगितले. ‘‘बंगळुरूत काहीही निष्पन्न झाले नाही. ए. बी. ने कारकीर्दीतील शंभर कसोटी सामन्यांचा पल्ला ओलांडला, हीच आमच्यासाठी जमेची बाजू होती. पहिल्या दिवसाचा अपवाद वगळता अन्य दिवशी पावसामुळे निराशाच झाली,’’ असे अमलाने सांगितले.