भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरूद्धची कसोटी मालिका २-१ने जिंकली आणि इतिहास रचला. अनेक खेळाडू दुखापतग्रस्त झालेले असूनही भारताच्या नव्या दमाच्या खेळाडूंनी सामना जिंकवून दिला. चौथ्या डावात ३२८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना शुबमन गिलने ९१ तर चेतेश्वर पुजाराने ५६ धावांची खेळी केली. पण ऋषभ पंतची फटकेबाज खेळी खऱ्या अर्थाने निर्णायक ठरली. आपली विकेट वाचवून त्याने भारताला विजय मिळवून दिला. विजयी फटका खेळताना पंतसोबत नवदीप सैनी नॉन-स्ट्राईकवर होता. त्याने या फटक्याआधी नक्की काय घडलं याबद्दलचा एक किस्सा सांगितला.

Video: क्वारंटाइन धमाल… अजिंक्य रहाणेचा लेकीसोबत भन्नाट डान्स

“पहिल्यांदाच मी ऋषभ पंतसोबत फलंदाजी करत होतो. मला त्याची फलंदाजी पाहून खूप मजा येत होती. तो आम्हाला सामना जिंकवून देणार याची मला खात्री होती. शार्दुल ठाकूर बाद झाल्यावर मी फलंदाजीसाठी गेलो आणि पंतला विचारलं की काय करायचं? त्याने मला स्पष्टपणे सांगितलं, ‘काही करू नकोस. फक्त सांगेन तेव्हा जोरात धाव घे. आणि उगाच जोखीम घेऊ नकोस.’ त्यानंतर पंत क्रीजमध्ये गेला आणि पुन्हा माझ्याजवळ आला आणि तेव्हा म्हणाला, ‘तू काळजी करू नकोस. मी बघून घेतो काय करायचं ते…”, असा किस्सा सैनीने टीओआईशी बोलताना सांगितला.

IPL 2024 Punjab Kings vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024: बुमराहला षटकार मारल्यावर आशुतोष शर्माचा आनंद गगनात मावेना! सामन्यानंतर म्हणाला….
IPL 2024 Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore Match Updates in Marathi
Surya is Back: अशक्य वाटणारा फटका ‘मसल मेमरी’मुळे खेळतो! सूर्यकुमार यादवनं सांगितलं यशाचं कारण
Mayank Yadav Reveals About Fitness
IPL 2024 : सर्वात वेगवान चेंडू टाकणाऱ्या मयंक यादवच्या फिटनेसचं रहस्य काय? त्यानंच सांगितलं तो काय करतो?
IPL 2024 What Was That Thing on MS Dhoni Strapped on His Ankle
IPL 2024: मॅचनंतर धोनीच्या पायाला काय बांधण्यात येतं?

शाहिद आफ्रिदीला ‘युएई’मध्ये प्रवेशास नकार; विमानतळावरच रोखलं…

“पंतने जेव्हा फटका मारला तेव्हा तो जोरात माझ्याकडे बघून ओरडला, ‘पळ’. मला अंदाज होताच की तो धाव काढण्यासाठी चेंडू टोलवणार. चेंडू मारल्यावर त्याच्या ओरडण्यातून मला इतकंच कळलं की मला जमेल तितकं वेगाने धावायचं आहे. त्यामुळे मी चेंडू कुठे गेलाय हे न पाहता पळत सुटलो. जेव्हा पंत धावायचा थांबला आणि विजय साजरा करू लागला तेव्हा मला समजलं की आम्ही जिंकलोय”, असं सांगत सैनीने त्या ऐतिहासिक क्षणाला उजाळा दिला.