सुरक्षेच्या कारणास्तव न्यूझीलंड पाठोपाठ इंग्लंड संघानेही पाकिस्तान दौरा रद्द केला आहे. न्यूझीलंड क्रिकेट संघ तब्बल १८ वर्षानंतर पाकिस्तानात क्रिकेट सामने खेळणार होता. न्यूझीलंड आणि पाकिस्तान संघात तीन एकदिवसीय आणि पाच टी २० सामन्यांची मालिका खेळली जाणार होती. न्यूझीलंड आणि इंग्लंड संघाने दौरा रद्द केल्याने संपूर्ण जगात पाकिस्तानची नाचक्की झाली आहे. दहशतवादाला खतपाणी घालणारा देश म्हणून पाकिस्तानकडे पाहिलं जातं आहे. त्यानंतर आता पाकिस्तानमधील मंत्री तोंड लपवण्यासाठी भारताकडे बोट दाखवू लागले आहेत.

धमकी एका ईमेलद्वारे मिळाली होती, असं पाकिस्तानचे सूचना व प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी सांगितलं आहे. “न्यूझीलंड क्रिकेट संघाला पाकिस्तानचा दौरा रद्द करण्याची धमकी भारतातून आली होती. तसेच ईमेल हा भारतातून आला होता”, असं पाकिस्तानातील मंत्री फवाद चौधरी यांनी दावा केला आहे. “सिंगापूर स्थान दाखवणाऱ्या व्हीपीएनद्वारे भारतातून हा ईमेल तयार करण्यात आल आहे.” असंही त्यांनी पुढे सांगितलं. दुसरीकडे, संघ मायदेशी परतल्यानंतर न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने धमकीची माहिती मिळाली, पण तपशील दिला नसल्याचं सांगितलं. तर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून याबाबत प्रतिक्रिया आलेली नाही.

Sarabjit singh pakistan prisoner
बावीस वर्षे पाकिस्तान तुरुंगात हालअपेष्टा सोसलेल्या सरबजित सिंग यांच्या मारेकर्‍याची हत्या; नेमके हे प्रकरण काय होते?
Iran Israel Attack Updates in Marathi
Iran Israel Attack : इस्रायलवरील हल्ल्यानंतर भारताने जाहीर केली भूमिका; निवेदनात म्हटलं, “दोन्ही देशांतील शत्रूत्वाबद्दल…”
Despite the efforts of PR Sreejesh the Indian hockey team lost
श्रीजेशच्या प्रयत्नांनंतरही भारतीय हॉकी संघाचा पराभव
west bengal chief minister bidhan chandra roy include berubari in indian territory from east pakistan
कचाथीवू गमावले, पण बेरूबारी कमावले… नेहरूंचा विरोध डावलून बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी कसा मिळवला पूर्व पाकिस्तानकडून भारतीय भूभाग?

IPL 2021: माजी क्रिकेटपटू म्हणतो, “स्पर्धा संपण्याआधीच विराट कोहली…”

यापूर्वी मार्च २००९ मध्ये लाहोरच्या स्टेडियमबाहेर कसोटी सामना खेळण्यासाठी आलेल्या श्रीलंका संघावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. ज्यात श्रीलंकेचे खेळाडू जखमी झाले होते. दुसरीकडे, न्यूझीलंडचा संघही पाकिस्तान मालिका खेळण्यासाठी येत होता. मात्र किवी संघाला श्रीलंका संघावर लाहोरमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला झाल्याचं समजताच, ते अर्ध्यावरून मायदेशी परतलो होते.