श्रेयस अय्यरसह अनेक खेळाडूंना झालेल्या दुखापती आणि सलग तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये सूर्यकुमार यादवच्या अपयशामुळे टीम इंडियाला पुन्हा एकदा २०१९च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या बोटीवर बसवले आहे, असे माजी वेगवान गोलंदाज झहीर खानचे मत आहे. चार वर्षांपूर्वीही टीम इंडिया चौथ्या क्रमांकासाठी कायमस्वरूपी फलंदाज शोधण्यासाठी धडपडत होती. २०१९च्या विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत संघाला प्रगती करता आली नाही याचे हे एक कारण होते. यावेळी एकदिवसीय विश्वचषक भारतात होत आहे आणि यजमानांनी चौथ्या क्रमांकावर पुन्हा विचार करण्याची गरज झहीरला वाटते.

सूर्यकुमार ठरला अयशस्वी

टीम इंडियाला सूर्यकुमार यादवकडून खूप आशा होत्या. भारताचा नियमित क्रमांक चौथा श्रेयस अय्यर जखमी झाल्याने सूर्यकुमारला संधी देण्यात आली. मात्र, तो यशस्वी होऊ शकला नाही आणि एकदिवसीय मालिकेत सलग तीन गोल्डन डक झळकावले. त्यामुळे टीम इंडियामध्ये या बॅटिंग पोझिशनबाबत पुन्हा एकदा अडचणी निर्माण झाल्या आहेत. श्रेयस सध्या जखमी असून नजीकच्या भविष्यात त्याची पुनरागमनाची शक्यता कमी आहे. अशा स्थितीत खेळाडूला या भूमिकेत स्थिरावावे लागेल.

Ashutosh Sharma's Reaction After Defeat
‘त्या प्रशिक्षकांना मी आवडत नसे, ते मला संघात घेत नसत. यामुळे मी नैराश्यात गेलो’, आशुतोष शर्माचा संघर्ष
IPL 2024 Punjab Kings vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024: आशुतोष शर्माची आयपीएलमध्ये ऐतिहासिक कामगिरी, १७ वर्षांच्या इतिहासात ही कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
Rr Vs Gt Ipl 2024 Sanju Samson 50th Match As Captain
RR vs GT : संजू सॅमसनने ५०व्या सामन्यात केला खास पराक्रम, ‘या’ बाबतीत रोहित शर्मासह तीन कर्णधारांना टाकले मागे
Despite the efforts of PR Sreejesh the Indian hockey team lost
श्रीजेशच्या प्रयत्नांनंतरही भारतीय हॉकी संघाचा पराभव

हेही वाचा: World Cup 2023: पंजाब क्रिकेट असोसिएशनला मोठा धक्का! मोहाली स्टेडियम वर्ल्डकपच्या शर्यतीतून बाहेर, जाणून घ्या

भारतीय संघाला झहीर खानने सुनावले खडेबोल

माजी वेगवान गोलंदाज झहीर म्हणाला, “हा फलंदाजीचा क्रम असा आहे की संघ व्यवस्थापनाला नक्कीच पुन्हा विचार करावा लागेल. संघ व्यवस्थापनाला पुन्हा चौथ्या क्रमांकावर पर्याय शोधावा लागणार आहे. २०१९ च्या विश्वचषकासाठीही हीच चर्चा होती. चार वर्षांनंतरही आपण त्याच गोष्टीबद्दल बोलत आहोत. आम्ही आता एकाच बोटीत आहोत. मला समजते की श्रेयस अय्यर हा तुमचा नियमित नंबर वन फलंदाज आहे. तुम्ही श्रेयसला ती भूमिका आणि ती जबाबदारी घेताना बघत आहात, पण अजून बराच काळ तो जखमी झाला असेल तर तुम्हाला उत्तर शोधावे लागेल.”

हेही वाचा: Haris Rauf Video:  पीएसएल ट्रॉफी घेऊन हरिस रौफ पोहोचला वाघा बॉर्डरवर अन् चाहत्यांकडून झाला ट्रोल, Video व्हायरल

खराब कामगिरीनंतरही भारताचा कर्णधार रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या आणि वनडेतील निर्णायक पराभवानंतर पत्रकार परिषदेत सूर्यकुमारला पाठिंबा दिला. रोहित म्हणाला, “या मालिकेतील तीन सामन्यांत त्याने फक्त तीन चेंडू खेळले. मला याची किती काळजी घ्यावी हे माहित नाही. खरे सांगायचे तर त्याने तीन चांगले चेंडू खेळले. त्याला माहित आहे की त्याला काय करायचे आहे. तो फिरकी खूप छान खेळतो. आम्ही वर्षानुवर्षे पाहिले आहे. म्हणून आम्ही त्याला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात संघात ठेवले आणि शेवटच्या १५-२० षटकांसाठी त्याला भूमिका दिली जिथे तो आपला खेळ करू शकेल, पण तसे झाले नाही. हे कोणालाही होऊ शकते. लवकरच चुका सुधारल्या नाहीत तर भारतीय संघासाठी परिस्थिती अवघड होऊ शकते.” अशा कडक शब्दात सुनावले.