भारतीय क्रीडा क्षेत्राला चांगले प्रशासन मिळावे या अभिनव बिंद्राच्या नेतृत्वाखालील अभियानाला पाठिंबा देताना, तत्त्वांशी तडजोड नाही अशी भूमिका घेतली. खेळ आणि खेळाच्या कामकाजात तत्त्वांशी तडजोड करता येणार नाही, असे भूपतीने स्पष्ट केले. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनला भ्रष्टाचारापासून मुक्त करण्यासाठी नेमबाजपटू बिंद्राने ऑनलाइन अभियान सुरू केले आहे.