मुंबईचा युवा क्रिकेटपटू पृथ्वी शॉचा क्रिकेटमध्ये पुनरागमनाचा मुहूर्त ठरला आहे. उत्तेजक द्रव्यांचं सेवन केल्याप्रकरणी बंदीची शिक्षा भोगत असलेल्या पृथ्वीची सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेसाठी मुंबईच्या संघात निवड झाली आहे. अखेरच्या दोन साखळी सामन्यांसाठी मुंबईच्या संघाची घोषणा करण्यात आलेली आहे. मात्र पृथ्वी शॉ १७ नोव्हेंबररोजी मुंबई विरुद्ध आसाम याच सामन्यांत खेळू शकणार आहे.

उर्वरित दोन सामन्यांसाठी असा असेल मुंबईचा संघ –

सूर्यकुमार यादव (कर्णधार), श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ (१७ नोव्हेंबरपासून खेळण्यास पात्र), आदित्य तरे, जय बिस्ता, सिद्धेश लाड, शिवम दुबे, शुभम रांजणे, शम्स मुलानी, ध्रुवील मटकर, शार्दुल ठाकूर, नायक, धवल कुलकर्णी, तुषार देशपांडे आणि एकनाथ केरकर