Ravichandran Ashwin Says: भारताचा वरिष्ठ ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाचा भाग आहे. आर अश्विनने नुकतेच त्याच्या यूट्यूब चॅनलवर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीबद्दल मोठे विधान केले आहे. त्याने या दोन धडाकेबाज खेळाडूंच्या चाहत्यांना संयम बाळगण्यास सांगितले आहे. २०१४ टी२० विश्वचषक आणि २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघाने अंतिम सामन्यात जागा मिळवली होती. मात्र, संघाला विजय मिळवता आला नाही. मागील १० वर्षात भारताची कामगिरी खराब मानली जाऊ शकत नाही, पण किताबाच्या वनवासामुळे अनेकदा विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना टीकेचा धनी व्हावे लागले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यानंतर रोहित शर्माने ब्रॉडकास्टरवर टीका केली. ‘कधी कधी योग्य गोष्टीही दाखवल्या पाहिजेत’, असं रोहित म्हणाला. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहितने ११०१ दिवसांनी शतक झळकावले. मात्र, रोहित शर्माने युक्तिवाद केला की या कालावधीत तो केवळ १२ एकदिवसीय सामने खेळला आहे. रोहित शर्मा त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला २०२२ मध्ये टी२० वर्ल्ड कप चॅम्पियन बनवू शकला नाही.

हेही वाचा: Virat Kohli Form: क्रिकेट चाहत्या मामाने भाचीला बनवली चॅम्पियन! आता विराट कोहली उचलणार खर्च, धोनीही झाला तिचा फॅन

रविचंद्रन अश्विन याने हे मोठं विधान केलं आहे

भारताचा वरिष्ठ ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने क्रीडा चाहत्यांना ICC ट्रॉफी जिंकण्याच्या प्रयत्नात स्टार फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासोबत संयम बाळगण्याचे आवाहन केले. महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरलाही सहा प्रयत्नांनंतर विश्वचषक मिळाला असल्याचे त्याने म्हटले आहे. भारतीय संघाने २०११ मध्ये शेवटचा विश्वचषक जिंकला होता, परंतु २०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीपासून संघाला आयसीसी स्पर्धेत यश मिळालेले नाही.

रोहित-विराटने साथ दिली

आपल्या माजी आणि सध्याच्या भारतीय कर्णधाराचे समर्थन करताना अश्विनने त्याच्या यूट्यूब चॅनलवर म्हटले, “तुम्ही हे जिंकले नाही आणि ते जिंकले नाही हे सांगणे खूप सोपे आहे. १९८३च्या विश्वचषकानंतर महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर १९९२, १९९६, १९९९, २००३ आणि २००७ विश्वचषक खेळला. अखेर २०११ मध्येच त्यांना विश्वचषक जिंकता आला. त्याला ट्रॉफी जिंकण्यासाठी सहा वर्ल्डकपपर्यंत वाट पाहावी लागली.

हेही वाचा: U19 T20 World Cup Final : महिला टीम इंडियाची न्यारीच क्रेझ, अंतिम सामना पाहण्यासाठी क्रिकेटपटूच्या आईने घेतला ‘हा’ निर्णय

एमएस धोनी एक महान खेळाडू असल्याचे सांगितले

अश्विन म्हणाला, “दुसरा महान खेळाडू एमएस धोनी आला आणि त्याने येताच विश्वचषक जिंकला, याचा अर्थ असा नाही की प्रत्येकाच्या बाबतीत असे होईल. बरं म्हटलं, नाही का? रोहित आणि कोहलीला थोडा वेळ देण्याबाबत अश्विनने क्रिकेटप्रेमींशी चर्चा केली. तो म्हणाला, ‘हे खेळाडू (रोहित शर्मा, विराट कोहली) २००७ मध्ये खेळले नव्हते. रोहित शर्मा २०११च्या विश्वचषकात खेळू शकला नव्हता. कोहली २०११, २०१५, २०१९ मध्ये खेळला आहे आणि आता तो २०२३ मध्ये चौथा विश्वचषक खेळणार आहे. यावर्षी भारताला ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करायचे आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: R ashwin r ashwin gave this big statement on rohit virat indian cricket fans will not be able to digest avw
First published on: 29-01-2023 at 17:05 IST