पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष रमीज राजा हे भारतीय क्रिकेट संघ आणि बीसीसीआयबद्दल अनेकदा काहीतरी बोलत असतात. यावेळी पुन्हा त्यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयवर गंभीर आरोप केले आहेत. भाजपचा प्रभाव असलेल्या मानसिकतेने बीसीसीआयचा ताबा घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे. रमीज राजा यांच्या या वक्तव्यानंतर त्यांनाही चांगलेच अडचणीत सामोरं जावं लागत आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष रमीज राजा यांनी बीसीसीआयला ‘हातातील खेळणं’ असा आरोप करत भारतातील सत्ताधारी पक्ष भारतीय जनता पक्षावर निशाना साधला आहे. जोपर्यंत भाजप सत्तेवर आहे तोपर्यंत पीसीबी आणि बीसीसीआय यांचे संबंध सुधारणे अवघड आहे असेही त्यांनी म्हटले आहे.

External Affairs Minister S Jaishankar asserted that the two armies are fighting for supremacy on the Chinese border
चीन सीमेवर दोन्ही सैन्यांत वर्चस्वासाठी चढाओढ; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे प्रतिपादन
jitendra kumar trivedi bjp
भाजपाच्या ‘या’ नेत्यावर तृणमूल नेत्यांविरुद्ध कट रचल्याचा आरोप
Shrikant Shinde
कल्याणमधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; भाजपा कार्यकर्त्यांवरही टीका, म्हणाले…
Nitin Gadkaris development speed is limited in his second term as MP compared to the first five years
पहिल्या पाच वर्षाच्या तुलनेत दुसऱ्यांदा खासदारकी भूषविताना गडकरींच्या विकास गतीला मर्यादा

बीसीसीआयबद्दल काय म्हणाले रमीज राजा?

जिओ न्यूजनुसार, लाहोरमधील एका सरकारी महाविद्यालयात संबोधित करताना रमीज राजा म्हणाले की, “आयसीसी (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) बीसीसीवर प्रभाव टाकते कारण बहुतेक कमाई भारतातून येते. यासोबतच आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानवर बंदी घालण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.”

हेही वाचा: Rishabh Pant on IPL: दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का! ऋषभ पंतच्या बाबतीत संचालक सौरव गांगुलीने दिली मोठी अपडेट

पीसीबीचे माजी अध्यक्ष रमीज राजा म्हणाले की, भारताची मानसिकता पाकिस्तानी क्रिकेटची प्रगती थांबवण्याची आहे. रमीज राजा म्हणाले, “दुर्दैवाने भारतात जे घडत आहे ते म्हणजे भाजपची मानसिकता आहे. मी जाहीर केलेली मालमत्ता, मग ती PJL असो किंवा पाकिस्तान महिला लीग असो, आम्ही आमची स्वतःची पैसा कमावणारी मालमत्ता तयार करू शकलो ज्यामुळे आम्ही पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला निधी पुरवू शकू आणि आम्हाला आयसीसीच्या निधीपासून दूर नेले.”

पाकिस्तानला डावलण्याचा प्रयत्न

रमीज राजा त्यानंतर ते पुढे म्हणाले, “आमच्या स्वातंत्र्याशी तडजोड केली आहे कारण आयसीसीची बहुतेक संसाधने भारतात बनविली जातात. भारताची मानसिकता पाकिस्तानला उपेक्षित ठेवण्याची असेल, तर आपण ना इकडचे, ना तिकडे. त्यांनी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डांशी बोलून आयसीसीमध्ये नेतृत्वाची भूमिका घेण्यास सांगितले आहे जेणेकरुन संस्था पैशाच्या दबावापुढे झुकणार नाही.”

हेही वाचा: IND vs SL 1st ODI: अशी असते खिलाडूवृत्ती! रोहितच्या कृतीवर श्रीलंकन दिग्गजांनी उधळली स्तुतिसुमने, भारतीयांची उंचावली मान

आशिया चषकावरून वाद सुरू झाला

आशिया चषक २०२३ संदर्भात बीसीसीआय आणि पीसीबीमध्ये वाद सुरू आहे. वास्तविक २०२३ चा आशिया कप पाकिस्तानमध्ये प्रस्तावित आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी आशिया चषक पाकिस्तानमध्ये आयोजित केल्यास भारत त्यात सहभागी होणार नाही, असे सांगितले होते. दुसरीकडे, जय शाह यांच्या वक्तव्यानंतर तत्कालीन पीसीबी रमीज राजा यांनी विरोध केला आणि पाकिस्तानला वनडे वर्ल्ड कपमधून बाहेर ठेवण्याबाबत बोलले. वास्तविक, २०२३ मध्ये एकदिवसीय विश्वचषक भारतात होणार आहे. अशा स्थितीत दोन्ही देशांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू आहे.