बंगळूरु :सर्फराज खानच्या झुंजार शतकी खेळीमुळे मुंबईने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील पहिल्या डावात ३७४ अशी समाधानकारक धावसंख्या उभारली. त्यानंतर मध्य प्रदेशने गुरुवारी दुसऱ्या दिवसअखेर १ बाद १२३ असे चिवट प्रत्युत्तर दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सर्फराजने यंदाच्या रणजी हंगामातील चौथे शतक झळकावताना २४३ चेंडूंत १३४ धावा केल्या. त्यामुळे ५ बाद २४८ धावसंख्येवरून दुसऱ्या दिवसाला प्रारंभ करणाऱ्या ४१ वेळा विजेत्या मुंबईला तग धरता आला. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला, तेव्हा मध्य प्रदेशचा संघ २५१ धावांनी पिछाडीवर आहे. यश दुबे ४४ आणि शुभम शर्मा ४१ धावांनी खेळत असून, या जोडीने दुसऱ्या गडय़ासाठी ७९ धावांची अविरत भागीदारी केली आहे. तुषार देशपांडेने सलामीवीर हिमांशू मंत्रीला (३१) बाद करण्यात यश मिळवले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranji trophy final sarfaraz century puts mumbai in dominant position zws
First published on: 24-06-2022 at 02:46 IST