भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ टी-20 विश्वचषकानंतर समाप्त होणार आहे. टी-20 विश्वचषकास ऑक्टोबरमध्ये सुरूवात होणार असून, १४ नोव्हेंबर रोजी अंतिम सामना खेळला जाणार आहे. म्हणजे पुढील दोन महिन्यानंतर रवी शास्त्री हे भारतीय संघाचे प्रशिक्षक असणार नाहीत. तर, रवी शास्त्री नंतर भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी आता अनिल कुंबळे यांचं नाव पुन्हा एकदा जोरदार चर्चेत आलं आहे. बीसीसीआय आता पुन्हा एकदा भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदीअनिल कुंबळेना परत आणण्याच्या तयारीत आहे आणि त्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, रवी शास्त्री यांनी आपल्या कार्यकाळाबाबत एक विधान केलं आहे आणि म्हटलं आहे की प्रशिक्षकाच्या कार्यकाळात त्यांनी सर्व काही मिळवलं, ज्यांची ते अपेक्षा बाळगून होते. त्यांनी हे देखील सांगितले की, जर भारतीय टीम टी-20 विश्वचषक जिंकली तर हे बाब त्यांच्या कार्यकाळात ”सोने पे सुहागा” ठरेल. द गार्डियनला दिलेल्या मुलाखतीत शास्त्रींनी सांगितले की त्यांनी आपल्या कार्यकाळात सर्वकाही मिळवलं.

शास्त्री म्हणाले की, ”मी असं यामुळे मानतो कारण मी ते सर्व काही मिळवलं जे मला हवं होतं. नंबर 1 च्या रुपात पाच वर्ष(टेस्ट क्रिकेटमध्ये), ऑस्ट्रेलियामध्ये दोनवेळा जिंकण्यासाठी, इंग्लडमध्ये जिंकण्यासाठी. मी या उन्हाळ्याच्या सुरूवातीस मायकल एथरटनशी बोललो होतो आणि म्हणालो होतो की, माझ्यासाठी हे अंतिम आहे – ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियामध्ये हरवनं आणि कोविड काळात इंग्लडमध्ये विजय मिळवणं. आम्ही इंग्लडवर २-१ ने विजय मिळवला आणि ज्याप्रकारे लॉर्ड्स आणि ओवलवर खेळलो ते खास होतं.”

शास्त्रीच्या कार्यकाळात भारताने दक्षिण अफ्रिका, न्युझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लडमध्ये टी-20 मालिकेत विजय मिळवला. शास्त्रींनी सांगितले की, आम्ही जगातील प्रत्येक देशाला पांढऱ्या बॉलच्या क्रिकेट सामन्यामध्ये हरवल आहे, जर आम्ही टी-20 विश्वचषक जिंकलो तर हे सोने पर सुहागा होईल…यापेक्षा जास्त काहीच नाही.

रवी शास्त्रींनी आपल्या विधानात म्हटलं की, मी एक गोष्ट मानतो, आपल्या स्वागताला कधी उशीर करू नये आणि मी म्हणेल की, मी ज्या गोष्टीपासून बाहेर होऊ इच्छित होतो, त्याच्या संदर्भात मी खूप काही मिळवलं आहे. ऑस्ट्रेलियाला हरवणं, कोविडमध्ये इंग्लडमधील मालिकेच नेतृत्व करण्यासाठी? हे क्रिकेटमधील माझ्या चार दशकातील सर्वात समाधानकारक क्षण आहेत.

विराट कोहली कर्णधार व रवी शास्त्री प्रशिक्षक असताना भारताला एकही आयसीसीची स्पर्धा जिंकता आलेली नाही. भारताला शेवटी स्पर्धा ही धोनीच्या नेतृत्वाखालीच जिंकता आलेलेली आहे.