प्रीमिअर बॅडमिंटन लीगच्या (पीबीएल) १५ गुणांच्या नव्या नियमांमुळे प्रत्येक सामना रंगतदार होणार आहे. त्यामुळे खेळाडूंची खरी कसोटी लागणार आहे, असे मत भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने व्यक्त केले. २ जानेवारीपासून पीबीएलला सुरुवात होणार आहे.

‘‘काही नवीन नियमांमुळे ही लीग मनोरंजक होणार आहे. या नियमांमुळे आमचा कस लागणार आहे. १५ गुणांमुळे प्रत्येक गेमवर पकड कायम राखणे गरजेचे आहे.  प्रत्येक दिवशी गुणतालिकेत नवीन संघ आघाडीवर गेलेला पाहायला मिळेल,’’ असे सिंधू म्हणाली.