डेहराडून : कार अपघातात गंभीर जखमी झालेला भारताचा यष्टिरक्षक- फलंदाज ऋषभ पंतच्या प्रकृतीत झपाटय़ाने सुधारणा होत असून, सोमवारी त्याला अतिदक्षता विभागाबाहेर हलवण्यात आले.

‘‘पंतची प्रकृती एकदम चांगली आहे. पंतच्या प्रकृतीत झपाटय़ाने सुधारणा दिसल्यामुळे रविवारी रात्रीच त्याला अतिदक्षता विभागातून बाहेर हलविण्यात आले. मात्र पंतच्या पायाला होणाऱ्या वेदना कायम आहेत. पंतची ‘एमआरआय’ चाचणी करण्याचा सध्या विचार नाही,’’ असे पंतवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.

Kandalvan, Kandalvan belt,
ज्वलनशील पदार्थांद्वारे कांदळवनावर घाला, सिडकोकडील २३० हेक्टर कांदळवन पट्टा हस्तांतरीत करण्यास टाळाटाळ कशासाठी ?
pleas challenging maratha quota in bombay hc
मराठा आरक्षण : प्रवेश, नोकऱ्यांवर टांगती तलवार; नियुक्त्या अंतिम निर्णयाच्या अधीन – उच्च न्यायालय
Emphsises on right to be free from the adverse effects of climate change
“नागरिकांना हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार”; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयात महत्त्वपूर्ण काय आहे?
Smuggling of liquor from Goa by vehicle stuff of worth 61 lakh seized
वाहनातून गोव्यातील मद्यसाठ्याची तस्करी, ६१ लाखाचा मुद्देमाल जप्त

India vs Sri Lanka : भारत विरुद्ध श्रीलंका पहिला ट्वेन्टी-२० सामना कधी? कुठं मोफत पाहता येणार

कार अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर पंतला शुक्रवारी डेहराडून मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रस्त्यावरील खड्डा चुकवताना पंतचा कारवरील ताबा सुटला आणि अपघात घडल्याचे उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी रविवारी रुग्णालयात पंतची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. दिल्ली जिल्हा क्रिकेट संघटनेचे (डीडीसीए) संचालक श्याम शर्मा यांनीही पंतची रुग्णालयात भेट घेतली होती.
पंतवरील उपचार आणि त्याच्या प्रकृतीविषयी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) सातत्याने पाठपुरावा घेत आहे. पंतच्या उपचारावरील सर्व खर्च ‘बीसीसीआय’च्या वतीनेच करण्यात येणार आहे. पंतची प्रकृती सुधारत असली, तरी अपघातात गुडघा आणि घोटय़ाला झालेल्या दुखापतीमुळे पंतला किमान सहा महिने क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहावे लागण्याची शक्यता आहे. तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका आणि ‘आयपीएल’ स्पर्धेला मुकणे अपेक्षित आहे.